शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Kulbhushan Jadhav: न्यायालयात कसाबचा संदर्भ दिला अन् पाकिस्तान फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 15:24 IST

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान तोंडघशी

नवी दिल्ली: कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला धक्का दिला. पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला. जाधव यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं कायम ठेवली आहे. याशिवाय जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. पाकिस्ताननं या खटल्यात २६/११ हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा संदर्भ दिला. मात्र यामुळे पाकिस्तान फसला.पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अजमल कसाबचा उल्लेख केला. कसाबची तुलना कुलभूषण यांच्याशी करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला. भारतातही सैन्याच्या न्यायालयात सुनावणी घेतली जाते, असा युक्तिवाद पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र भारतानं पाकिस्तानचा खोटेपणा न्यायालयासमोर उघड केला. कसाबवरील खटल्याची सुनावणी न्यायालयात लाईव्ह झाली होती, हे भारताकडून स्पष्ट करण्यात आलं. 'कसाबचा खटला लढवण्यासाठी स्वतंत्र वकील देण्यात आला होता. एका माजी सॉलिसिटर अ‍ॅडिशनल जनरलनं न्यायालयात कसाबची बाजू मांडली. निष्पक्ष सुनावणीसाठी भारतानं सर्व प्रकारचे प्रयत्न केले. अनेकदा सर्वसामान्य भारतीयाला जी न्यायालयीन मदत मिळत नाही, ती कसाबला देण्यात आली,' हे भारतानं पुराव्यासह न्यायालयाला पटवून दिलं. 26 नोव्हेंबर २००८ ला लष्कर ए तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला. त्यामध्ये कसाबचा समावेश होता. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह १६५ जणांचा मृत्यू झाला. कसाबला मुंबईतील न्यायालयानं दोषी ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठरवली. पुण्यातील येरवडा कारागृहात कसाबला फाशी देण्यात आली.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानIndiaभारत