शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

मणिपूरचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, भाजप आमदाराचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 17:19 IST

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हाओकीप यांनी मणिपूरच्या जातीय विभाजनाला राजकीय आणि प्रशासकीय मान्यता देण्यास पाठिंबा दिला आहे.

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्याचे तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले पाहिजे, असे मत कुकी नेते आणि भाजप आमदार पाउलेनलाल हाओकीप यांनी व्यक्त केले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हाओकीप यांनी मणिपूरच्या जातीय विभाजनाला राजकीय आणि प्रशासकीय मान्यता देण्यास पाठिंबा दिला आहे. कुकी समाजाच्या नेत्यांनी यापूर्वीच कुकी जमातीच्या लोकांसाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली आहे. भाजप आमदाराच्या या मागणीला एक प्रकारे कुकी नेत्यांच्या वेगळ्या राज्याच्या मागणीलाही पाठिंबा आहे. 

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि मैतेई संघटनांचे एक समूह COCOMI ने (Coordinating Committee on Manipur Integrity) मणिपूरच्या विभाजनाच्या कोणत्याही मागणीला विरोध केला आहे. राजकीय जाणकारांच्या मते केंद्र सरकारही राज्याच्या विभाजनाच्या समर्थनात नाही. हाओकीप यांच्या सूचनेवर राजकीय समीक्षक म्हणतात की, विभागणी राज्यातील कुकी, मैतेई आणि नागा जमातींसाठी स्वतंत्र प्रदेश तयार करेल, परंतु मिश्र लोकसंख्या असलेल्या ठिकाणी समस्या निर्माण करेल. 

दरम्यान, मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार आतापर्यंत सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांना विस्थापनाचा सामना करावा लागत आहे. मैतेई समुदाय राज्यातील लोकसंख्येपैकी 53 टक्के आहे आणि बहुतेक लोक इंफाळ खोऱ्यात राहतात. नागा आणि कुकी जमातीचे लोक एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते राज्यातील डोंगराळ भागात राहतात. 

चुराचंदपूर जिल्ह्यातील साकोटमधील भाजप आमदार हाओकीप आणि इतर कुकी नेत्यांचे म्हणणे आहे की, बहुसंख्य समुदाय राज्य संसाधनांच्या वाटपावर नियंत्रण ठेवत आहे. आदिवासींच्या जमिनी संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केल्याबद्दलही कुकी नेत्याने नाराजी व्यक्त करत आदिवासींना त्यांचे हक्क दिले जात नसल्याचा आरोप केला. 

यावर्षी मणिपूर सरकारने वन कायद्यांतर्गत जंगलांच्या संरक्षणाच्या नावाखाली अनेक कुकी गावांवर बुलडोझर चालविला होता. सीमांकन अहवालावर बंदी घातल्याने कुकी समाजातही नाराजी आहे, असे भाजप आमदार हाओकीप म्हणाले. याचबरोबर, कुकी समाजाने इंग्रजांशीही लढा दिला होता आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत कुकी समाजाचे लोक सामील होते, असेही आमदार हाओकीप यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कुकी नेत्यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या समाजाची लोकसंख्या लक्षात घेता, सीमांकनानंतर त्यांच्या जागांची संख्या वाढू शकते. तर कुकी समुदाय अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असल्याचा आणि म्यानमारमधून अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याचा आरोपही मैतेई समुदायाने केला आहे. मात्र, कुकी समुदायाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा