शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कोरेगाव भीमा प्रकरण : राजकीय पक्षाची साक्ष काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 05:59 IST

कोरेगाव भीमा हिंसाचारात काही राजकीय पक्षांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला असल्याने राज्यातील सर्व राजकीय पक्षांची साक्ष नोंदविणार असल्याचे या प्रकरणाच्या चौकशी आयोगाने सोमवारी स्पष्ट केले.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारात काही राजकीय पक्षांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला असल्याने राज्यातील सर्व राजकीय पक्षांची साक्ष नोंदविणार असल्याचे या प्रकरणाच्या चौकशी आयोगाने सोमवारी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा हिंसाचाराबद्दल विधानसभेत केलेल्या वक्तव्याबाबत आयोगाने त्यांचीही साक्ष नोंदवावी, अशी मागणी करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते संजय लाखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आयोगापुढे सादर केला आहे. याचाच आधार घेत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही देवेंद्र फडणवीस यांना साक्षीदार म्हणून बोलाविण्याची विनंती आयोगाला केली. आंबेडकर या प्रकरणी स्वत:हून आयोगापुढे आले आहेत. त्यांच्या या विनंतीवर भूमिका स्पष्ट करताना आयोगाने या घटनेमागचे सत्य शोधून काढण्यासाठी; तसेच अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या साक्षी नोंदविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या सर्वांच्या साक्षी अंतिम टप्प्यात नोंदविणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.दरम्यान, घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील एका मंडळाचे सदस्य असलेल्या तानाजी साबळे यांनी सोमवारी आयोगापुढे साक्ष नोंदविली. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जनसमूह येणार, याची खात्री असल्याने येथे दवाखाने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, पिण्याच्या पाण्याची सोय व अन्य सुविधा उपलब्ध केल्याचा; तसेच भेट देण्यासाठी व तेथून बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्गिका केल्याचा दावा सरकारने केला होता. त्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला आणि अशा सुविधा प्रत्यक्षात होत्या का, यावर त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यावर साबळे यांनी गर्दीत या सुविधांकडे आपले लक्ष गेले नसल्याचे आयोगाला सांगितले.सुमीत मलिक यांचेही म्हणणे नोंदवण्याची मागणीकोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सदस्य सुमीत मलिक यांचीही साक्ष आयोगाने नोंदवावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांतर्फे करण्यात आली. घटनेवेळी मलिक राज्याचे मुख्य सचिव होते. त्यामुळे या घटनेची व त्या वेळी राज्य सरकारने केलेल्या कारवाईची माहिती त्यांना आहे. त्यामुळे आयोगाच्या व्यासपीठावरील मलिक यांनी आपली साक्ष नोंदवायला काहीच हरकत नाही, असे म्हणणे त्यांच्यातर्फे मांडण्यात आले.आयोगाचे अध्यक्ष जे.एन. पटेल यांनी आंबेडकर यांना याबाबतचा अर्ज करण्यास सांगितले. त्यावर आयोग पुण्यात सुनावणी घेईल, तेव्हा आपण हा अर्ज करू, असे त्यांनी स्पष्ट केले. आंबेडकर यांचा अर्ज मंजूर झाल्यास मलिक यांना नैतिकदृष्ट्या आयोगाचे सदस्य म्हणून काम पाहता येणार नाही. त्यामुळे सरकारला नव्याने सदस्याची नियुक्ती करण्याची वेळ येऊ शकते. परिणामी, आयोगाचे काम पूर्ण करण्यास विलंब होऊ शकतो.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारnewsबातम्या