शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कोरेगाव-भीमा प्रकरण : न्या. चंद्रचूड यांनी पोलीस कारवाईविषयी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 06:57 IST

भीमा-कोरेगाव दंगलीत आरोप असलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा फरकाने निकाल देऊन हस्तक्षेप करण्यास नकार दिला असला, तरी न्या. धनंजय चंद्रचूड यांनी पोलिसांच्या कारवाईविषयी शंका व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली -  भीमा-कोरेगाव दंगलीत आरोप असलेल्या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन विरुद्ध एक अशा फरकाने निकाल देऊन हस्तक्षेप करण्यास नकार दिला असला, तरी न्या. धनंजय चंद्रचूड यांनी पोलिसांच्या कारवाईविषयी शंका व्यक्त केली आहे.सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्या. अजय खानविलकर यांनी पोलीस कारवाई योग्य असल्याचे मत नोंदवले आहे. मात्र, न्या. चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्र लिहून अटक करण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांचे नक्षली संबंध असल्याचे आढळून आलेले नाही, त्यामुळे केवळ अंदाजाच्या आधारे त्यांच्या स्वातंत्र्याचे हनन करता कामा नये, असे म्हटले आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांचे वर्तन योग्य नव्हते, सुनावणीच्या दरम्यान पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीमुळे मीडिया ट्रायलचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे पोलिसांच्या कारवाईविषयी शंका निर्माण होते, असेही न्या. चंद्रचूड यांनी नमूद केले. वरवरा राव, सुधा भारद्वाज, वर्नोन गोन्सालविस, गौतम नवलखा आणि अरुण परेरा या पाच कार्यकर्त्यांना गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी अटक केली होती.न्या. चंद्रचूड यांनी पोलिसांच्या चौकशीविषयी शंका उपस्थित केली असली तरी अन्य दोघा न्यायाधीशांनी कोणत्या तपास यंत्रणेमार्फत आणि कशा प्रकारे चौकशी व्हावी, हे आरोपी ठरवू शकत नाही, असे निकालपत्रात स्पष्ट केले आहे. याच आधारे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, ही याचिकाकर्त्यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnewsबातम्या