शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

CoronaVirus Live Updates : हृदयस्पर्शी! कोरोनामुळे आईला गमावलं; तब्बल 21 दिवस मृत्यूशी लढत नवजात बाळाने जगण्याचं युद्ध जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 11:46 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. यानंतर 21 दिवस मृत्यूशी लढत  बाळाने जगण्याचं युद्ध जिंकल्याची घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,09,46,074 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,792 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 624 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,11,408 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहे. तर काहींच्या डोक्यावर आई-वडिलांचं छत्रच हरवलं आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. यानंतर 21 दिवस मृत्यूशी लढत  बाळाने जगण्याचं युद्ध जिंकल्याची घटना समोर आली आहे. 

कोलकातामध्ये ही घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाली. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असल्याने डॉक्टरांनी सी-सेक्शनच्या माध्यमातून महिलेची डिलिव्हरी केली. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही तासांनीच आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बाळाची प्रकृती देखील गंभीर होती. 21 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर आता बाळ पुर्णपणे बरं झाल्याची माहिती मिळत आहे. आता बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय राखी मंडल विश्वास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना गर्भवती असताना कोरोनाची लागण झाली होती. मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती आणखी बिघडली. डिलिव्हरी नंतर राखी यांचा मृत्यू झाला. बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्याची विशेष काळजी घेण्यात आली. डॉक्टरांनी बाळाला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं आणि काही दिवसांनी हळूहळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 

कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार?; 'या' 8 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेटने वाढवलं टेन्शन, धोक्याचा इशारा

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लोकांचा निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. आठ राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार. तपासणीमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तेथील संक्रमण हे नियंत्रणाबाहेर आहे. तर केरळचा प़ॉझिटिव्हिटी रेट हा 10.5 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 73 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्के झाला आहे. ज्यातील 45 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यातील आहेत. यामुळेच तज्ज्ञांची विशेष टीम या राज्यांत पाठवण्यात आली आहे. सिक्किम - 19.5%, मणिपूर - 15%, मिझोरम - 11.8%, केरळ - 10.5%, मेघालय - 9.4, अरुणाचल प्रदेश - 7.4%, नागालँड - 6%, त्रिपुरा - 5.6% या राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूIndiaभारतwest bengalपश्चिम बंगाल