शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

CoronaVirus Live Updates : हृदयस्पर्शी! कोरोनामुळे आईला गमावलं; तब्बल 21 दिवस मृत्यूशी लढत नवजात बाळाने जगण्याचं युद्ध जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 11:46 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. यानंतर 21 दिवस मृत्यूशी लढत  बाळाने जगण्याचं युद्ध जिंकल्याची घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3,09,46,074 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38,792 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 624 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,11,408 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक मन सुन्न करणाऱ्या घटना घडत आहेत. कोरोनाने अनेकांच्या जवळची माणसं हिरावून नेली आहे. तर काहींच्या डोक्यावर आई-वडिलांचं छत्रच हरवलं आहे. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. कोरोनामुळे एका नवजात बाळाने आपल्या आईला गमावलं आहे. यानंतर 21 दिवस मृत्यूशी लढत  बाळाने जगण्याचं युद्ध जिंकल्याची घटना समोर आली आहे. 

कोलकातामध्ये ही घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाली. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आईच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असल्याने डॉक्टरांनी सी-सेक्शनच्या माध्यमातून महिलेची डिलिव्हरी केली. बाळाचा जन्म झाल्यानंतर काही तासांनीच आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बाळाची प्रकृती देखील गंभीर होती. 21 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर आता बाळ पुर्णपणे बरं झाल्याची माहिती मिळत आहे. आता बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय राखी मंडल विश्वास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना गर्भवती असताना कोरोनाची लागण झाली होती. मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती आणखी बिघडली. डिलिव्हरी नंतर राखी यांचा मृत्यू झाला. बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्याची विशेष काळजी घेण्यात आली. डॉक्टरांनी बाळाला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं आणि काही दिवसांनी हळूहळू बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 

कोरोनाची तिसरी लाट लवकर येणार?; 'या' 8 राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेटने वाढवलं टेन्शन, धोक्याचा इशारा

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना लोकांचा निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. आठ राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार. तपासणीमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तेथील संक्रमण हे नियंत्रणाबाहेर आहे. तर केरळचा प़ॉझिटिव्हिटी रेट हा 10.5 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील तब्बल 73 जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्के झाला आहे. ज्यातील 45 जिल्हे हे पूर्वोत्तर राज्यातील आहेत. यामुळेच तज्ज्ञांची विशेष टीम या राज्यांत पाठवण्यात आली आहे. सिक्किम - 19.5%, मणिपूर - 15%, मिझोरम - 11.8%, केरळ - 10.5%, मेघालय - 9.4, अरुणाचल प्रदेश - 7.4%, नागालँड - 6%, त्रिपुरा - 5.6% या राज्यातील पॉझिटिव्हिटी रेटने चिंता वाढवली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूIndiaभारतwest bengalपश्चिम बंगाल