शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

औरंगजेबानं शिवरायांसोबत जे केलं, तसंच ममता वागताहेत; राज्यपालांनी उपसली 'तलवार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 16:23 IST

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्यात सातत्याने खटके उडत आहे.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील वाद काही थांबायला तयार नाही. त्यात आता धनखड यांनी पुन्हा बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला आहे. पश्चिम बंगालमधील लोकशाही संपली आहे. औरंगजेबानं शिवरायांसोबत जे केलं, तसंच ममता वागत असल्याचा आरोप धनखड यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्यात सातत्याने खटके उडत आहे. विधानसभा अध्यक्षांनी स्नेहभोजनासाठी राज्यपालांना बोलवून ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्याची घटना असो की, राज्यपाल विधानसभेत जाण्यासाठी आले असता गेट बंद करण्याची घटना असो. मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्यातील वाद नेहमीचा चर्चेचा विषय ठरला आहे.

आता राज्यपाल धनखड यांनी पुन्हा मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालमधील लोकशाही संपली आहे. कधी वीसी रूम तर कधी विधानसभेचे गेट बंद होतात. मी जेव्हा एखांद्या शहरात भेट देण्यासाठी जातो, त्यावेळी तिथे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न तर केले जात नाही ना ? असा प्रश्न राज्यपाल धनखड यांनी उपस्थित केला.

औरंगजेबानं शिवाजी महाराजांसोबत जे केले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ममता वागताहेत. मी ममता यांना औरंगजेब म्हणत नाही. मात्र पश्चिम बंगालच्या आयरन लेडी ह्या औरंगजेबाप्रमाणे काम करत असल्याची टीका राज्यपाल धनखड यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री बॅनर्जी आणि राज्यपाल धनखड यांच्यामधील वाद अधिकच वाढताना पाहायला मिळत आहे.