शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

'हरामी नाला' ठरतोय पाकिस्तानच्या दहशतीचा नवा मार्ग; भारतासाठी घातक ठरणार का 'हा' मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 10:47 IST

हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे.

अहमदाबाद - पाण्याच्या आतमधून हल्ला करण्याची क्षमता ठेवणारे पाकिस्तानचे प्रशिक्षित कमांडो गुजरातच्या कच्छ खाडीतून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर गुजरातच्या समुद्रकिनारी हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हरामी नाला क्रिकमधून पाकिस्तानचे सशस्त्र कमांडो भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला चीनशिवाय कोणत्याही देशाची साथ मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्यासाठी दहशतीचं षडयंत्र रचत आहे. यासाठी पाकिस्तानने हरामी नाला या नव्या मार्गाची निवड केली आहे. कुठे आहे हा हरामी नाला? आणि का आहे गुजरातवर निशाणा? जाणून घेऊया. 

'हरामी नाला' गुजरातच्या कच्छ परिसराला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाला वेगळे करणारा 22 किमीचा मोठा समुद्रीमार्ग आहे. या दोन्ही देशांमध्ये हरामी नाला क्रिक परिसरातील 96 किलोमीटर जागा सीमावादात अडकली आहे. 22 किमी हरामी नाला हा घुसखोर आणि तस्करांसाठी स्वर्गासारखा आहे. या भागात मोठ्या प्रमाणात तस्करांचे राज्य आहे. त्याचमुळे याचं नाव हरामी नाला असं ठेवण्यात आलं आहे. याठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि पातळी हवामानानुसार वारंवार बदलत राहत असते. त्यामुळे ही जागा भयंकर धोकादायक आहे. 

2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय मच्छिमारांची नौका कुबेरला याच हरामी नालातून जप्त केली होती. त्यानंतर गुजरातमार्गे मुंबईत प्रवेश करून 26/11 हल्ला घडवून आणला होता. हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र याठिकाणी झिंगा मासे, रेड सैमेन मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांना मोठी मागणीदेखील आहे. याच कारणासाठी हरामी नाला भारत आणि पाकिस्तानमधील मच्छिमारांसाठी आवडीचं ठिकाण आहे. 

कांडला पोर्ट, मुद्रा पोर्ट याठिकाणची सुरक्षा केंद्रीय गुप्तचर विभागाने माहिती दिल्यानंतर वाढविण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रशिक्षित कमांडो याच हरामी नाल्याचा वापर करून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी माहिती दिली होती की, जैश-ए-मोहम्मदने स्वत:ची समुद्री विंग बनविली आहे. यात दहशतवाद्यांना पाण्याच्या आतमध्ये हल्ला करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हरामी नालाच्या माध्यमातून भारतात दहशत पसरविण्याचं षडयंत्र रचलं असल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.  

टॅग्स :TerrorismदहशतवादIndiaभारतPakistanपाकिस्तान