शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'हरामी नाला' ठरतोय पाकिस्तानच्या दहशतीचा नवा मार्ग; भारतासाठी घातक ठरणार का 'हा' मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 10:47 IST

हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे.

अहमदाबाद - पाण्याच्या आतमधून हल्ला करण्याची क्षमता ठेवणारे पाकिस्तानचे प्रशिक्षित कमांडो गुजरातच्या कच्छ खाडीतून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर गुजरातच्या समुद्रकिनारी हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हरामी नाला क्रिकमधून पाकिस्तानचे सशस्त्र कमांडो भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला चीनशिवाय कोणत्याही देशाची साथ मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्यासाठी दहशतीचं षडयंत्र रचत आहे. यासाठी पाकिस्तानने हरामी नाला या नव्या मार्गाची निवड केली आहे. कुठे आहे हा हरामी नाला? आणि का आहे गुजरातवर निशाणा? जाणून घेऊया. 

'हरामी नाला' गुजरातच्या कच्छ परिसराला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाला वेगळे करणारा 22 किमीचा मोठा समुद्रीमार्ग आहे. या दोन्ही देशांमध्ये हरामी नाला क्रिक परिसरातील 96 किलोमीटर जागा सीमावादात अडकली आहे. 22 किमी हरामी नाला हा घुसखोर आणि तस्करांसाठी स्वर्गासारखा आहे. या भागात मोठ्या प्रमाणात तस्करांचे राज्य आहे. त्याचमुळे याचं नाव हरामी नाला असं ठेवण्यात आलं आहे. याठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि पातळी हवामानानुसार वारंवार बदलत राहत असते. त्यामुळे ही जागा भयंकर धोकादायक आहे. 

2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय मच्छिमारांची नौका कुबेरला याच हरामी नालातून जप्त केली होती. त्यानंतर गुजरातमार्गे मुंबईत प्रवेश करून 26/11 हल्ला घडवून आणला होता. हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र याठिकाणी झिंगा मासे, रेड सैमेन मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांना मोठी मागणीदेखील आहे. याच कारणासाठी हरामी नाला भारत आणि पाकिस्तानमधील मच्छिमारांसाठी आवडीचं ठिकाण आहे. 

कांडला पोर्ट, मुद्रा पोर्ट याठिकाणची सुरक्षा केंद्रीय गुप्तचर विभागाने माहिती दिल्यानंतर वाढविण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रशिक्षित कमांडो याच हरामी नाल्याचा वापर करून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी माहिती दिली होती की, जैश-ए-मोहम्मदने स्वत:ची समुद्री विंग बनविली आहे. यात दहशतवाद्यांना पाण्याच्या आतमध्ये हल्ला करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हरामी नालाच्या माध्यमातून भारतात दहशत पसरविण्याचं षडयंत्र रचलं असल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.  

टॅग्स :TerrorismदहशतवादIndiaभारतPakistanपाकिस्तान