शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

'हरामी नाला' ठरतोय पाकिस्तानच्या दहशतीचा नवा मार्ग; भारतासाठी घातक ठरणार का 'हा' मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 10:47 IST

हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे.

अहमदाबाद - पाण्याच्या आतमधून हल्ला करण्याची क्षमता ठेवणारे पाकिस्तानचे प्रशिक्षित कमांडो गुजरातच्या कच्छ खाडीतून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर गुजरातच्या समुद्रकिनारी हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हरामी नाला क्रिकमधून पाकिस्तानचे सशस्त्र कमांडो भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला चीनशिवाय कोणत्याही देशाची साथ मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्यासाठी दहशतीचं षडयंत्र रचत आहे. यासाठी पाकिस्तानने हरामी नाला या नव्या मार्गाची निवड केली आहे. कुठे आहे हा हरामी नाला? आणि का आहे गुजरातवर निशाणा? जाणून घेऊया. 

'हरामी नाला' गुजरातच्या कच्छ परिसराला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाला वेगळे करणारा 22 किमीचा मोठा समुद्रीमार्ग आहे. या दोन्ही देशांमध्ये हरामी नाला क्रिक परिसरातील 96 किलोमीटर जागा सीमावादात अडकली आहे. 22 किमी हरामी नाला हा घुसखोर आणि तस्करांसाठी स्वर्गासारखा आहे. या भागात मोठ्या प्रमाणात तस्करांचे राज्य आहे. त्याचमुळे याचं नाव हरामी नाला असं ठेवण्यात आलं आहे. याठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि पातळी हवामानानुसार वारंवार बदलत राहत असते. त्यामुळे ही जागा भयंकर धोकादायक आहे. 

2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय मच्छिमारांची नौका कुबेरला याच हरामी नालातून जप्त केली होती. त्यानंतर गुजरातमार्गे मुंबईत प्रवेश करून 26/11 हल्ला घडवून आणला होता. हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र याठिकाणी झिंगा मासे, रेड सैमेन मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांना मोठी मागणीदेखील आहे. याच कारणासाठी हरामी नाला भारत आणि पाकिस्तानमधील मच्छिमारांसाठी आवडीचं ठिकाण आहे. 

कांडला पोर्ट, मुद्रा पोर्ट याठिकाणची सुरक्षा केंद्रीय गुप्तचर विभागाने माहिती दिल्यानंतर वाढविण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रशिक्षित कमांडो याच हरामी नाल्याचा वापर करून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी माहिती दिली होती की, जैश-ए-मोहम्मदने स्वत:ची समुद्री विंग बनविली आहे. यात दहशतवाद्यांना पाण्याच्या आतमध्ये हल्ला करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हरामी नालाच्या माध्यमातून भारतात दहशत पसरविण्याचं षडयंत्र रचलं असल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.  

टॅग्स :TerrorismदहशतवादIndiaभारतPakistanपाकिस्तान