शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

'हरामी नाला' ठरतोय पाकिस्तानच्या दहशतीचा नवा मार्ग; भारतासाठी घातक ठरणार का 'हा' मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 10:47 IST

हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे.

अहमदाबाद - पाण्याच्या आतमधून हल्ला करण्याची क्षमता ठेवणारे पाकिस्तानचे प्रशिक्षित कमांडो गुजरातच्या कच्छ खाडीतून भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर गुजरातच्या समुद्रकिनारी हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हरामी नाला क्रिकमधून पाकिस्तानचे सशस्त्र कमांडो भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला चीनशिवाय कोणत्याही देशाची साथ मिळाली नाही. त्यामुळे पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्यासाठी दहशतीचं षडयंत्र रचत आहे. यासाठी पाकिस्तानने हरामी नाला या नव्या मार्गाची निवड केली आहे. कुठे आहे हा हरामी नाला? आणि का आहे गुजरातवर निशाणा? जाणून घेऊया. 

'हरामी नाला' गुजरातच्या कच्छ परिसराला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाला वेगळे करणारा 22 किमीचा मोठा समुद्रीमार्ग आहे. या दोन्ही देशांमध्ये हरामी नाला क्रिक परिसरातील 96 किलोमीटर जागा सीमावादात अडकली आहे. 22 किमी हरामी नाला हा घुसखोर आणि तस्करांसाठी स्वर्गासारखा आहे. या भागात मोठ्या प्रमाणात तस्करांचे राज्य आहे. त्याचमुळे याचं नाव हरामी नाला असं ठेवण्यात आलं आहे. याठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि पातळी हवामानानुसार वारंवार बदलत राहत असते. त्यामुळे ही जागा भयंकर धोकादायक आहे. 

2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय मच्छिमारांची नौका कुबेरला याच हरामी नालातून जप्त केली होती. त्यानंतर गुजरातमार्गे मुंबईत प्रवेश करून 26/11 हल्ला घडवून आणला होता. हरामी नालामध्ये मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र याठिकाणी झिंगा मासे, रेड सैमेन मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांना मोठी मागणीदेखील आहे. याच कारणासाठी हरामी नाला भारत आणि पाकिस्तानमधील मच्छिमारांसाठी आवडीचं ठिकाण आहे. 

कांडला पोर्ट, मुद्रा पोर्ट याठिकाणची सुरक्षा केंद्रीय गुप्तचर विभागाने माहिती दिल्यानंतर वाढविण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रशिक्षित कमांडो याच हरामी नाल्याचा वापर करून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंग यांनी माहिती दिली होती की, जैश-ए-मोहम्मदने स्वत:ची समुद्री विंग बनविली आहे. यात दहशतवाद्यांना पाण्याच्या आतमध्ये हल्ला करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हरामी नालाच्या माध्यमातून भारतात दहशत पसरविण्याचं षडयंत्र रचलं असल्याचा दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे.  

टॅग्स :TerrorismदहशतवादIndiaभारतPakistanपाकिस्तान