शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

जीवन क्षणभंगुर आहे; कोरोना लसीबाबत सद्गुरुंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 15:12 IST

कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) देशव्यापी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देकोरोना लसीबाबत सद्गुरूंनी व्यक्त केले विचारजीवन क्षणभंगुर असल्याची लोकांना जाणीव झाली आहे - सद्गुरूबॉम्बस्फोटांपेक्षा एकमेकांच्या शिंकेला लोकं घाबरत आहेत - सद्गुरू

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) देशव्यापी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यानंतर अनेक नेते, मंत्री, दिग्गजांनी लस घेतल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. जीवन हे क्षणभंगुर असल्याचेही ते म्हणाले. (know what sadhguru jaggi vasudev says about vaccination in india)

एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सद्गुरू यांनी कोरोना लसीकरणाबाबत सविस्तरपणे आपली मते मांडली. जेव्हा आपण श्रद्धेने, निष्ठा ठेवून तसेच विश्वास बाळगून एखादे काम करता तेव्हा ते सर्वोत्तम होत असते. तेव्हा आपल्याला सामान्य मानवाला शक्य नसलेल्या गोष्टींची प्रेरणा मिळू शकते, असे सद्गुरू यांनी सांगितले. कोरोना लसीला घाबरण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.

रतन टाटांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस; म्हणाले, “लवकरच...”

लसींमुळे जीवन सुरक्षित

कोरोना लसीबाबत बोलतान ते पुढे म्हणाले की, लहानपणापासून आपल्याला कोणत्या ना कोणत्या लसी टोचल्या जातात, दिल्या जातात. यामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. असे नसते, तर १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीयांची सरासरी वयोमर्यादा केवळ २८ वर्षे राहिली असती, असे सांगत आधुनिक विज्ञानाचे फायदे आपण लक्षात घेत नाही. आधुनिक विज्ञानाने विकसित केलेली औषधे नसती, तर आपण केव्हाच मृत्युमुखी पडलो असतो. साधा तापही माणसाच्या मृत्युचे कारण ठरू शकतो. त्यासाठी कॅन्सर व्हायची आवश्यकता नाही, असे सद्गुरू म्हणाले. 

...म्हणून जनता घाबरत आहे

कोरोना विषाणू संसर्ग घातक आहे. एका शिंकेनेही आपले जीवन संपू शकते, हे या विषाणूने दाखवून दिले आहे. आजच्या घडीला बॉम्बस्फोटापेक्षा लोकं एकमेकांच्या शिंकांना जास्त घाबरत आहेत, असे सद्गुरूंनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकं जीवनाच्या क्षणभंगुरतेचा अधिक विचार करत आहेत. याबाबत आपण विचार करता, तेव्हा आपण वास्तविकपणे अध्यात्मिक विचार करता, अध्यात्माकडे जाता, असे सद्गुरू म्हणाले. विनाकारण कोणत्याही गोष्टीसाठी माणसे वेळ वाया घालवत नाही. कारण आपल्या हातात आता मर्यादित वेळ राहिला आहे, याची जाणीव लोकांना झाली आहे, असे सद्गुरूंनी नमूद केले. 

काय सांगता! कोरोनाचा फैलाव वुहानमधून नाही; WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा

दरम्यान, उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोना लसीचा पहिला डोस शनिवारी घेतला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. त्याबाबत मी आभारी आहे. हे खूपच सोपे आहे आणि याचा बिलकूल त्रास झाला नाही. प्रत्येक व्यक्तीला लवकरच कोरोना लस मिळून तो सुरक्षित होईल, असे मला खरच वाटते, असा विश्वास रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केला. अनेक ठिकाणी कोरोना लसीबाबत संभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गज आणि ज्येष्ठ व्यक्तींने कोरोना लस घेतल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत विश्वास वाढेल, असे सांगितले जात आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या