शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
2
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
3
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
4
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
5
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
6
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
7
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
8
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
9
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
10
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
11
भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
12
सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
13
Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
14
भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
15
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
16
Winter Recipe: हाय-प्रोटिन 'बाजरी मुंगलेट': थंडीत वजन कमी करण्यासाठी आणि नाश्त्यासाठी सर्वोत्तम पौष्टिक रेसिपी!
17
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
18
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
19
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
20
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
Daily Top 2Weekly Top 5

...यामुळे पंतप्रधान मोदींनी निवडली होती टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यासाठी 5 वाजताची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 18:26 IST

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते.

ठळक मुद्देज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे, या नक्षत्राचा स्वामी राहू आहे  राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो 

मुंबई - जनता कर्फ्यूदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्यासाठी 22 मार्चचा सायंकाळी पाज वाजताचा मुहूर्त निवडला होता. मोदींनी हाच मुहूर्त का निवडला? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. तर चला जाणून घेऊया, पंतप्रधान मोदींनी हीच वेळ का निडवडली असावी.  

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते. आज 22 तारीख आहे. याचा अर्थ 2+2 = 4, 4 हा राहुचा अंक आहे. तसेच 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अशी 'कुंडली' ज्योतिष अभ्यासक आचार्य डॉ. ज्योतिवर्धन साहनी यांनी मांडली आहे. 

ज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता. या काळात वातावरणातील विषाणू हटविण्यासाठी शंखनाद आणि घंटानाद केला जातो. याकडेही डॉ. साहनी यांनी लक्ष वेधले. यापार्श्वभूमीवरच कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्ररक्षकांना दाद देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता टाळ्या, घंटानाद आणि थाळ्या वाजवण्याची साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिली असावी.

ज्योतिषशास्त्र मानायचे की नाही, हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. या सगळ्या मांडणीनुसार, कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना हे शास्त्र पटत नाही, त्यांनी या मांडणीचा विचार करू नये. मात्र, गर्दी टाळणे, अधिक माणसांच्या संपर्कात न येणे, हेच कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रभावी माध्यम आहे. हे वास्तव प्रत्येकालाच मान्य करावे लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस काम असेल तरच बाहेर पडा, हे सर्व नेत्यांचे आणि यंत्रणांचे आवाहन प्रत्येकाने ऐकणे, आवश्यक आहे.

देशात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील जवळपास 170 हून अधिक देशांतील 3,05,046 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 13 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.