शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

...यामुळे पंतप्रधान मोदींनी निवडली होती टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यासाठी 5 वाजताची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 18:26 IST

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते.

ठळक मुद्देज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे, या नक्षत्राचा स्वामी राहू आहे  राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो 

मुंबई - जनता कर्फ्यूदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्यासाठी 22 मार्चचा सायंकाळी पाज वाजताचा मुहूर्त निवडला होता. मोदींनी हाच मुहूर्त का निवडला? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. तर चला जाणून घेऊया, पंतप्रधान मोदींनी हीच वेळ का निडवडली असावी.  

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते. आज 22 तारीख आहे. याचा अर्थ 2+2 = 4, 4 हा राहुचा अंक आहे. तसेच 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अशी 'कुंडली' ज्योतिष अभ्यासक आचार्य डॉ. ज्योतिवर्धन साहनी यांनी मांडली आहे. 

ज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता. या काळात वातावरणातील विषाणू हटविण्यासाठी शंखनाद आणि घंटानाद केला जातो. याकडेही डॉ. साहनी यांनी लक्ष वेधले. यापार्श्वभूमीवरच कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्ररक्षकांना दाद देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता टाळ्या, घंटानाद आणि थाळ्या वाजवण्याची साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिली असावी.

ज्योतिषशास्त्र मानायचे की नाही, हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. या सगळ्या मांडणीनुसार, कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना हे शास्त्र पटत नाही, त्यांनी या मांडणीचा विचार करू नये. मात्र, गर्दी टाळणे, अधिक माणसांच्या संपर्कात न येणे, हेच कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रभावी माध्यम आहे. हे वास्तव प्रत्येकालाच मान्य करावे लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस काम असेल तरच बाहेर पडा, हे सर्व नेत्यांचे आणि यंत्रणांचे आवाहन प्रत्येकाने ऐकणे, आवश्यक आहे.

देशात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील जवळपास 170 हून अधिक देशांतील 3,05,046 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 13 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.