शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

...यामुळे पंतप्रधान मोदींनी निवडली होती टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यासाठी 5 वाजताची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 18:26 IST

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते.

ठळक मुद्देज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे, या नक्षत्राचा स्वामी राहू आहे  राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो 

मुंबई - जनता कर्फ्यूदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजविण्यासाठी 22 मार्चचा सायंकाळी पाज वाजताचा मुहूर्त निवडला होता. मोदींनी हाच मुहूर्त का निवडला? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. तर चला जाणून घेऊया, पंतप्रधान मोदींनी हीच वेळ का निडवडली असावी.  

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तीचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहू आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. विषाणूंमुळे हवा दूषित होते. आज 22 तारीख आहे. याचा अर्थ 2+2 = 4, 4 हा राहुचा अंक आहे. तसेच 22 मार्चला शततारका नक्षत्रही आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. अशी 'कुंडली' ज्योतिष अभ्यासक आचार्य डॉ. ज्योतिवर्धन साहनी यांनी मांडली आहे. 

ज्योतीशशास्त्राप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ होता. या काळात वातावरणातील विषाणू हटविण्यासाठी शंखनाद आणि घंटानाद केला जातो. याकडेही डॉ. साहनी यांनी लक्ष वेधले. यापार्श्वभूमीवरच कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्ररक्षकांना दाद देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता टाळ्या, घंटानाद आणि थाळ्या वाजवण्याची साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिली असावी.

ज्योतिषशास्त्र मानायचे की नाही, हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. या सगळ्या मांडणीनुसार, कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना हे शास्त्र पटत नाही, त्यांनी या मांडणीचा विचार करू नये. मात्र, गर्दी टाळणे, अधिक माणसांच्या संपर्कात न येणे, हेच कोरोना संसर्ग रोखण्याचे प्रभावी माध्यम आहे. हे वास्तव प्रत्येकालाच मान्य करावे लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस काम असेल तरच बाहेर पडा, हे सर्व नेत्यांचे आणि यंत्रणांचे आवाहन प्रत्येकाने ऐकणे, आवश्यक आहे.

देशात आतापर्यंत कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील जवळपास 170 हून अधिक देशांतील 3,05,046 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 13 हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.