शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

किसान सन्मान योजना मोदींसाठी डोकेदुखी; केंद्र सरकारची लोकसभा निवडणुकीपूर्वी घाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 06:07 IST

शेतक-यांचा रोष कमी करून त्यांना आपलेसे करण्यासाठी जाहीर केलेल्या या योजनेचे पैसे मतदानापूर्वी प्रत्यक्ष शेतक-यांच्या हाती पडावेत, असा मोदींना आग्रह असून त्यासाठी त्यांनी संबंधित मंत्रालयांना युद्धपातळीवर कामाला लावले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लहान आणि अल्पभूधारक शेतक-यांना दरवर्षी सहा हजार रुपये थेट रोख मदत देण्याची ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ ही अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर केलेली महत्वाकांक्षी योजना लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रत्यक्षात कशी राबवावी, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक डोकेदुखीचा विषय ठरू पाहात आहे. शेतक-यांचा रोष कमी करून त्यांना आपलेसे करण्यासाठी जाहीर केलेल्या या योजनेचे पैसे मतदानापूर्वी प्रत्यक्ष शेतक-यांच्या हाती पडावेत, असा मोदींना आग्रह असून त्यासाठी त्यांनी संबंधित मंत्रालयांना युद्धपातळीवर कामाला लावले आहे.या रकमेचा गेल्या डिसेंबरपासूनच्या तिमाहीचा २,००० रुपयांचा पहिला हप्ता फेब्रुवारीत किंवा मार्चच्या सुरुवातीस देता यावा यासाठी या योजनेचे लाभार्थी ठरू शकणाºया देशभरातील १२.५६ कोटी शेतकºयांची बँकांशी तातडीने जोडणी करा, असे सक्त निर्देश पंतप्रधानांनी ग्रामीण विकास, कृषी, वित्त व माहिती तंत्रज्ञान या केंद्रीय मंत्रालयांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघेपर्यंत मदतीचा पहिला हप्ता शेतकºयांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाला की, प्रत्यक्ष मतदानापर्यंत आणखी दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता देणेही सरकारला सुलभ होईल.यासाठी या १२.५६ कोटी शेतकºयांच्या जमीन मालकीसंबंधीच्या महसुली नोंदी अद्ययावत करून त्यांची छाननी करणे व त्याच बरोबर या शेतकºयांची बँक खाती या योजनेशी जोडणे एवढे अवाढव्य काम अल्वाधीत उरकावे लागणार असून त्यासाठी वर उल्लेख तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगालसह १४ राज्यांमध्ये शेतजमिनींच्या संगणकीकृत नोंदी जवळजवळ पूर्ण झालेल्या असल्याने या राज्यांना या योजनेचा लगेच सर्वाधिक फायदा मिळेल. (राज्यनिहाय चित्र सोबतच्या तक्त्यांत दिले आहे.)मजेची गोष्ट अशी की गोव्यात लाभार्थी शेतकºयांची संख्या जेमतेम ५१ हजार आहे. पण त्यांच्याजमीन मालकीच्या नोंदींचे संगणकीकरण फक्त ५३ टक्के झालेले आहे.गेल्या ५५ महिन्यांत देशात ३४ कोटी ‘जनधन’ बँक खाती सुरु केली गेली. यापैकी १५ कोटी खाती ग्रामीण भागांत आहेत. ग्रामीण विकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘मरेगा’च्या एकूण १२ कोटी लाभार्थींपैकी आठ कोटी लाभार्थींच्या संगणकीकृत नोंदी झाल्या आहेत.त्यापैकी या योजनेच्या पात्रता निकषांत बसणारे शेतकरी किती आहेत हे शोधून त्यांची बँक खाती जोडून घेण्याचे काम सध्या ामचे मंत्रालय करत आहे.देशभरातील शेतजमीन असलेल्यांपैकी ६७ टक्के लोकसंख्या या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कक्षेत येईल, अशा प्रकारे तिची आखणी करण्यात आली आहे. राजकारणाच्या भाषेत सांगायचे तर लोकसभेच्या ५४२ पैकी ३४२ मतदारसंघांमध्ये या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.त्यांना डोळ््यापुढे ठेवूनच ही योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली असल्याने योजना प्रत्यक्ष सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पूर्वतयारी २५ फेब्रुवारीपर्यंत काही करून पूर्ण करण्याची सक्त ताकीद मोदींनी सर्व संबंधितांना दिली असल्याचे सूत्रांकडून समजते.देशभरातील १२.५६ कोटी लाभीर्थींपैकी सुमारे १.९८ कोटी शेतकरी महाराष्ट्रातील असतील. या सर्वांच्या जमीनमालकीच्या संगणकीकृत नोंदीचे काम ९८.८३ टक्के पूर्ण झाले असून बहुतांश शेतकºयांची बँक खाती जोडलेली आहेत.केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आमच्या मंत्रालयात ८.५९ कोटी शेतकºयांचा डेटाबेस उपलब्ध आहे. यापैकी २.२२ कोटी शेतकरी आधीपासून सुरु असलेल्या १५ विविध योजनांचे लाभार्थी आहेत व त्यापैकी २.०७ कोटी शेतकºयांची बँक खाती जोडलेली आहेत. किसान क्रेडिट कार्ड असलेल्यांची संख्या सात कोटी आहे.जमीन नोंदीच्या संगणकीकरणाची स्थितीराज्य नोंदी % पूर्णओदिशा 45,24,000 100कर्नाटक 69,77,000 99.99तेलंगणा 52,49,000 99.44मध्य प्रदेश 75,60,000 99.21झारखंड 23,04,000 99.12महाराष्ट्र 1,18,71,000 98.83प. बंगाल 69,69,000 98.10आंध्र प्रदेश 75,50,000 97.16राजस्थान 47,48,000 96.86गुजरात 36,34,000 96.41पंजाब 3,61,000 93.63उत्तराखंड 8,08,000 93.58सिक्कीम 57,000 93.29हरियाणा 11,17,000 92.93

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी