शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको

By देवेश फडके | Updated: February 1, 2021 21:49 IST

शनिवार, ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभरात रास्ता रोको करण्याची घोषणा किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे०६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात रास्ता रोकोदुपारी १२ ते ३ या कालावधीत चक्का जाम करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धारसंयुक्त किसान मोर्चाने केली रास्ता रोकोची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आता शनिवार, ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभरात रास्ता रोको करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. ०६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ०३ या कालावधीदरम्यान शेतकऱ्यांकडून रास्ता रोको केला जाणार आहे. 

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या केंद्रीय कृषी कायद्याला संपूर्ण देशभरातून विरोध होत आहे. देशातील सहा राज्यांनी या कृषी कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होत नाही, तोपर्यंत कृषी कायद्यांना स्थगिती देण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही.

Budget 2021 अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका मिटतील: नरेंद्र सिंह तोमर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकऱ्यांनी ३० जानेवारी रोजी एक दिवसाचा उपास केला. यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारात शेकडो पोलीस जखमी झाले. लाल किल्ल्यावर जाऊन शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. यानंतर शेतकरीआंदोलनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांना माध्यमांशी बोलताना अश्रु अनावर झाल्याने पुन्हा एकदा आंदोलनाला धार आल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यातील तरतुदींवरून चर्चेच्या ११ फेऱ्या पार पडल्या. मात्र, या सर्व फेऱ्या निष्फळ ठरल्या. दरम्यान, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांसह सर्वांच्या मनातील शंका दूर होतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात किमान आधारभूत किंमतीप्रति असलेली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आणि एपीएमसी आणखी सक्षम होण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत, असे तोमर यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनrakesh tikaitराकेश टिकैत