शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको

By देवेश फडके | Updated: February 1, 2021 21:49 IST

शनिवार, ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभरात रास्ता रोको करण्याची घोषणा किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे०६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात रास्ता रोकोदुपारी १२ ते ३ या कालावधीत चक्का जाम करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धारसंयुक्त किसान मोर्चाने केली रास्ता रोकोची घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर आता शनिवार, ०६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभरात रास्ता रोको करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आली आहे. ०६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ०३ या कालावधीदरम्यान शेतकऱ्यांकडून रास्ता रोको केला जाणार आहे. 

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या केंद्रीय कृषी कायद्याला संपूर्ण देशभरातून विरोध होत आहे. देशातील सहा राज्यांनी या कृषी कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होत नाही, तोपर्यंत कृषी कायद्यांना स्थगिती देण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही.

Budget 2021 अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका मिटतील: नरेंद्र सिंह तोमर

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकऱ्यांनी ३० जानेवारी रोजी एक दिवसाचा उपास केला. यापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत उसळलेल्या हिंसाचारात शेकडो पोलीस जखमी झाले. लाल किल्ल्यावर जाऊन शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. यानंतर शेतकरीआंदोलनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांना माध्यमांशी बोलताना अश्रु अनावर झाल्याने पुन्हा एकदा आंदोलनाला धार आल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यातील तरतुदींवरून चर्चेच्या ११ फेऱ्या पार पडल्या. मात्र, या सर्व फेऱ्या निष्फळ ठरल्या. दरम्यान, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांसह सर्वांच्या मनातील शंका दूर होतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात किमान आधारभूत किंमतीप्रति असलेली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आणि एपीएमसी आणखी सक्षम होण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत, असे तोमर यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनrakesh tikaitराकेश टिकैत