शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Kranti Padyatra: राजनाथ सिंहांची शिष्टाई; शेतकऱ्यांच्या चार मागण्या मोदी सरकारकडून मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:22 IST

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद

नवी दिल्ली: आपल्या विविध मागण्यांसाठी हरिद्वारहून सुरू झालेली हजारो शेतकऱ्यांची पदयात्रा दिल्लीच्या सीमेवर पोहोचली आहे. भारतीय किसान युनियनच्या वतीनं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शेतकरी आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांनी लाठीमार केल्यानं परिस्थिती काही वेळासाठी तणावपूर्ण झाली होती. यानंतर मोदी सरकारकडून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यामध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या चार मागण्या केल्या. शेतकऱ्यांची पदयात्रा रोखण्यासाठी उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे याठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या सरकारला मान्य असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. सरकारनं आमच्या 4 महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे महासचिव युद्धवीर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांना 5 टक्केच जीएसटी लावण्यात यावा, डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर्सवर राष्ट्रीय हरित लवादानं लादलेले निर्बंध हटवण्यात यावे या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनाची कमी दरानं होणारी विक्री रोखण्यासाठी कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. पीक विम्याबद्दलची शेतकऱ्यांची मागणीदेखील सरकारनं मान्य केली आहे. मात्र स्वामिनाथन आयोगाच्या अहवालातील शिफारशींची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याबद्दल अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीRajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदी