शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Kisan Kranti Padyatra: राजनाथ सिंहांची शिष्टाई; शेतकऱ्यांच्या चार मागण्या मोदी सरकारकडून मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 16:22 IST

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी साधला संवाद

नवी दिल्ली: आपल्या विविध मागण्यांसाठी हरिद्वारहून सुरू झालेली हजारो शेतकऱ्यांची पदयात्रा दिल्लीच्या सीमेवर पोहोचली आहे. भारतीय किसान युनियनच्या वतीनं या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शेतकरी आणि पोलीस आमने-सामने आले. पोलिसांनी लाठीमार केल्यानं परिस्थिती काही वेळासाठी तणावपूर्ण झाली होती. यानंतर मोदी सरकारकडून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यामध्ये सरकारनं शेतकऱ्यांच्या चार मागण्या केल्या. शेतकऱ्यांची पदयात्रा रोखण्यासाठी उत्तर प्रदेश-दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेडिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे याठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या सरकारला मान्य असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. सरकारनं आमच्या 4 महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे महासचिव युद्धवीर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांना 5 टक्केच जीएसटी लावण्यात यावा, डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर्सवर राष्ट्रीय हरित लवादानं लादलेले निर्बंध हटवण्यात यावे या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या उत्पादनाची कमी दरानं होणारी विक्री रोखण्यासाठी कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. पीक विम्याबद्दलची शेतकऱ्यांची मागणीदेखील सरकारनं मान्य केली आहे. मात्र स्वामिनाथन आयोगाच्या अहवालातील शिफारशींची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याबद्दल अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीRajnath Singhराजनाथ सिंहNarendra Modiनरेंद्र मोदी