शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Kisan Kranti Padyatra : भाजपा सरकारवर किसान युनियनचा हल्लाबोल, पण आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 09:19 IST

Kisan Kranti Padyatra : भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्लीतील किसान घाट येथे जाऊन संपवण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्लीतील किसान घाट येथे जाऊन संपवण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर रोखण्यात आलेल्या शेतकऱ्यांना नवी दिल्ली पोलिसांनी रात्री उशिरा किसान घाटावर जाण्याची परवानगी दिली. तेथे पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. 

''किसान घाट येथे फुले वाहून आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत'', असा आरोप करत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैट यांनी आंदोलक शेतकऱ्यांना आपापल्या घरी परतण्याचे आवाहन केले.

पहिल्याच दिवशी गाजीपूरजवळ पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवले होते. यावेळेस पोलिसांनी बळाचा वापरदेखील केला होता. यानंतर रात्री उशिरा शेतकऱ्यांना नवी दिल्लीत दाखल होण्याची परवानगी मिळाली. परवानगी मिळाल्यानंतर शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरसहीत किसान घाटच्या दिशेनं रवाना झाले. 

 

या आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या  - कर्जमाफी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. संपूर्ण कर्जमाफी मिळावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. हा आर्थिक समस्येचा मुद्दा असल्यानं या मागणीवरुन शेतकऱ्यांची सरकारसोबतची चर्चा फिसकटली.  

- वीजदरात करण्यात आलेली वाढ मागे घ्यावी, ही शेतकऱ्यांची दुसरी महत्त्वपूर्ण मागणी आहे. 

- गेल्या वर्षीपासून ऊसाची देणी थकीत आहेत. थकीत देणी देण्यात यावीत आणि साखर कारखाना मालक देणी देणार नाहीत, त्यांच्याविरोधात कारवाई केली जावी. 

- 60 वर्षांच्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन लागू करावी. 

- लवकरात लवकर स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात.   

- कर्जबाजारी शेतकरी आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी मिळावी व हक्काचं घरदेखील मिळावं. 

- शेतमालाला योग्य दर मिळावा.  

- डिझेलच्या दरांत कपात करावी   

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीNew Delhiनवी दिल्ली