शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

Kiren Rijiju: 'सीबीआय आता 'पिंजऱ्यात बंदिस्त पोपट' राहिलेली नाही', केंद्रीय कायदे मंत्र्यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:18 IST

Kiren Rijiju: 'सीबीआय देशातील सर्वोच्च गुन्हेगारी तपास संस्था म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे.'

नवी दिल्ली: केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण(CBI)च्या कामावर भाष्य केले. तसेच, माजी न्यायमुर्ती एनव्ही रमण यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ''सीबीआय देशातील सर्वोच्च गुन्हेगारी तपास संस्था म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे. ही आता 'पिंजऱ्यात बंदिस्त पोपट' राहिलेली नाही,'' असे रिजिजू म्हणाले आहेत. शनिवारी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांची पहिली परीषद झाली, यात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शनिवारी या कार्यक्रमात दिलेल्या भाषणाचा एक छोटा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला. यात ते म्हणतात की, ''एक काळ असा होता की, सरकारमध्ये बसलेले लोक तपासात अडथळे निर्माण करायचे. पण, आता तसे काहीही होताना दिसत नाही. सीबीआय आता 'पिंजऱ्यात बंदिस्त पोपट' राहिलेली नाही, तर ती भारतातील सर्वोच्च गुन्हेगारी तपास संस्था म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे." 

रिजिजू आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ''मला चांगलं आठवतंय की, एक काळ असा होता की सरकारमध्ये बसलेले लोक कधी कधी तपासात अडथळे ठरत होते. आज असे पंतप्रधान आहेत, जे स्वत: भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावत आहेत. सत्तेवर असणारे लोकच भ्रष्टाचार करत असतील, तर कोणत्या अडचणी येतात, हे मला माहीत आहे'', असेही ते म्हणाले.

माजी मुख्य न्यायमुर्तींनी केली होती टीका2013 मध्ये कोळसा खाण वाटप प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला ‘पिंजऱ्यात बंदिस्त पोपट’ म्हटले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) स्थापना दिनानिमित्त 1 एप्रिल रोजी 19वे डीपी कोहली स्मृती व्याख्यान देताना सरन्यायाधीश एनव्ही रमण म्हणाले होते की, सीबीआयच्या कृती आणि निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक प्रकरणांमुळे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तपास करणार्‍या संस्थेची विश्‍वासार्हता जनतेच्या चाचण्यांखाली आली आहे. विविध तपास यंत्रणांना एकाच छताखाली आणण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालय