शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Kiren Rijiju: 'सीबीआय आता 'पिंजऱ्यात बंदिस्त पोपट' राहिलेली नाही', केंद्रीय कायदे मंत्र्यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:18 IST

Kiren Rijiju: 'सीबीआय देशातील सर्वोच्च गुन्हेगारी तपास संस्था म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे.'

नवी दिल्ली: केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण(CBI)च्या कामावर भाष्य केले. तसेच, माजी न्यायमुर्ती एनव्ही रमण यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ''सीबीआय देशातील सर्वोच्च गुन्हेगारी तपास संस्था म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे. ही आता 'पिंजऱ्यात बंदिस्त पोपट' राहिलेली नाही,'' असे रिजिजू म्हणाले आहेत. शनिवारी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांची पहिली परीषद झाली, यात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शनिवारी या कार्यक्रमात दिलेल्या भाषणाचा एक छोटा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला. यात ते म्हणतात की, ''एक काळ असा होता की, सरकारमध्ये बसलेले लोक तपासात अडथळे निर्माण करायचे. पण, आता तसे काहीही होताना दिसत नाही. सीबीआय आता 'पिंजऱ्यात बंदिस्त पोपट' राहिलेली नाही, तर ती भारतातील सर्वोच्च गुन्हेगारी तपास संस्था म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे." 

रिजिजू आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ''मला चांगलं आठवतंय की, एक काळ असा होता की सरकारमध्ये बसलेले लोक कधी कधी तपासात अडथळे ठरत होते. आज असे पंतप्रधान आहेत, जे स्वत: भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावत आहेत. सत्तेवर असणारे लोकच भ्रष्टाचार करत असतील, तर कोणत्या अडचणी येतात, हे मला माहीत आहे'', असेही ते म्हणाले.

माजी मुख्य न्यायमुर्तींनी केली होती टीका2013 मध्ये कोळसा खाण वाटप प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला ‘पिंजऱ्यात बंदिस्त पोपट’ म्हटले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) स्थापना दिनानिमित्त 1 एप्रिल रोजी 19वे डीपी कोहली स्मृती व्याख्यान देताना सरन्यायाधीश एनव्ही रमण म्हणाले होते की, सीबीआयच्या कृती आणि निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक प्रकरणांमुळे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तपास करणार्‍या संस्थेची विश्‍वासार्हता जनतेच्या चाचण्यांखाली आली आहे. विविध तपास यंत्रणांना एकाच छताखाली आणण्यासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालय