शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

किरण बेदींचा दुचाकीवरुन दौरा, पॉंडेचेरी महिलांसाठी रात्रीही सुरक्षित असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 17:28 IST

महिलांसाठी रात्रीच्यावेळेसही पॉंडेचेरी सुरक्षित असल्याचा दावा नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केला आहे. हा दावा त्यांनी रात्रीच्यावेळेस दुचाकीवरुन केलेल्या दौऱ्यानंतर केला आहे

ठळक मुद्देदुचाकी दौऱ्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.नायब राज्यपाल पदावर असणारी व्यक्ती हेल्मेटविना प्रवास कसा केला असा प्रश्न ट्वीटरवर विचारला जात आहे.

पुदुच्चेरी, दि.19-  महिलांसाठी रात्रीच्यावेळेसही पॉंडेचेरी सुरक्षित असल्याचा दावा नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केला आहे. हा दावा त्यांनी दुचाकीवरुन केलेल्या दौऱ्यानंतर केला आहे. पुदुच्चेरी महिलांसाठी रात्रीच्यावेळेसही सुरक्षित असल्याचं आढळलं तरीही सुरक्षेसाठी अजून काही पावलं उचलावी लागतील असंही बेदी यांनी यावेळेस सांगितले. दुचाकीवरुन दौरा केल्यानंतर त्यांनी ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे.

दुचाकीवरुन प्रवास करताना किरण बेदी यांनी आपला चेहरा जास्तीत जास्त फडक्याने झाकून घेण्याचा प्रयत्न केला. नायब राज्यपाल स्वतः हा दौरा करत असल्याचे कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून ही खबरदारी त्यांनी घेतली असावी. मात्र त्यांचे या दुचाकी दौऱ्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. नायब राज्यपाल पदावर असणारी व्यक्ती हेल्मेटविना प्रवास कसा केला असा प्रश्न ट्वीटरवर विचारला जात आहे. पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी नियक्ती झाल्यापासून किरण बेदी यांच्याविरोधात सत्ताधारी कॉंग्रेसने अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनीही बेदी यांच्या निर्णयांवर टीका केली आहे. तसेच नायब राज्यपालांचे अधिकार कमी करण्यात यावे अशी मागणीही सत्ताधारी कॉंग्रेसद्वारे विधानसभेत मंजूर करण्यात आली. मध्यंतरी किरण बेदी यांचे हिटलरच्या रुपातील चित्रही पुदुच्चेरीमध्ये होर्डिंगवर लावण्यात आले होते.

पुन्हा निवडणूक लढणार नाही - किरण बेदी

शाही इमामाच्या फतव्यामुळे माझा पराभव किरण बेदी यांचा दावा

दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी निवडणुकीला सामोऱ्या गेल्या होत्या. मात्र निवडणुकीत त्यांच्यासह पक्षाचा दारुण पराभव झाला होता. या निवडणुकीमध्ये भाजपाला केवळ तीन (आता पोटनिवडणुकीमुळे 4) जागा मिळाल्या होत्या. या पराभवानंतर बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी नेमण्यात आले. किरण बेदी यांनी पोलीस प्रशासनात प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यामुळे तसेच तिहारसारख्या मोठ्या कारागृहाची जबाबदारी सांभाळल्यामुळे पुदुच्चेरीमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थीर राहिल असेही मत ट्वीटवर या दुचाकी दौऱ्यानंतर व्यक्त होत आहे.

टॅग्स :Indiaभारत