शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

'दहशतवाद्यांनो, जवानांना मारण्यापेक्षा काश्मीर लुटणाऱ्यांना ठार करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 22:00 IST

जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचं वादग्रस्त विधान

श्रीनगर: जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. दहशतवाद्यांनी पोलीस, जवान यांच्याऐवजी भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या हत्या कराव्यात, असं वक्तव्य मलिक यांनी केलं. कारगिलवरील भाषणादरम्यान त्यांनी हे विधान केलं. 'ही मुलं (दहशतवादी) विनाकारण आपल्या माणसांना मारतात. पीएसओ, एसडीओंच्या हत्या करतात. त्यांना तुम्ही का मारताय? त्यापेक्षा ज्यांनी तुमचा देश लुटला त्यांना मारा. ज्यांनी काश्मीरमधील संपत्ती लुटली, त्यांचा खात्मा करा. अशांपैकी एकाला तरी तुम्ही मारलंय का? बंदूक हातात घेऊन काहीही साध्य होणार नाही,' असं सत्यपाल सिंह म्हणाले. शुक्रवारी अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या काकांच्या मुलाच्या सुरक्षा रक्षकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्या हत्येच्या संदर्भात मलिक यांनी हे विधान केल्याचं बोललं जात आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकाची रायफल घेऊन त्याला ठार केलं. याशिवाय अनंतनागमधील बिजबेहरा शहरात पीडीपीचे वरिष्ठ नेते सज्जाद मुफ्ती यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हवालदारावरदेखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. राज्यपाल सत्यपाल सिंह याआधीही वादग्रस्त विधानामुळे अनेकदा अडचणीत सापडले आहेत. दहशतवाद्यांच्या मृत्यूनं मला दु:ख होतं, असं वक्तव्य मलिक यांनी जानेवारीत केलं होतं. 'पोलीस आपलं काम अगदी व्यवस्थित करत आहेत. मात्र एक जरी जीव गेला, मग तो दहशतवाद्याचा का असेना, त्यानं मला दु:ख होतं,' असं मलिक म्हणाले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी