शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

'दहशतवाद्यांनो, जवानांना मारण्यापेक्षा काश्मीर लुटणाऱ्यांना ठार करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 22:00 IST

जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचं वादग्रस्त विधान

श्रीनगर: जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. दहशतवाद्यांनी पोलीस, जवान यांच्याऐवजी भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या हत्या कराव्यात, असं वक्तव्य मलिक यांनी केलं. कारगिलवरील भाषणादरम्यान त्यांनी हे विधान केलं. 'ही मुलं (दहशतवादी) विनाकारण आपल्या माणसांना मारतात. पीएसओ, एसडीओंच्या हत्या करतात. त्यांना तुम्ही का मारताय? त्यापेक्षा ज्यांनी तुमचा देश लुटला त्यांना मारा. ज्यांनी काश्मीरमधील संपत्ती लुटली, त्यांचा खात्मा करा. अशांपैकी एकाला तरी तुम्ही मारलंय का? बंदूक हातात घेऊन काहीही साध्य होणार नाही,' असं सत्यपाल सिंह म्हणाले. शुक्रवारी अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या काकांच्या मुलाच्या सुरक्षा रक्षकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्या हत्येच्या संदर्भात मलिक यांनी हे विधान केल्याचं बोललं जात आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकाची रायफल घेऊन त्याला ठार केलं. याशिवाय अनंतनागमधील बिजबेहरा शहरात पीडीपीचे वरिष्ठ नेते सज्जाद मुफ्ती यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हवालदारावरदेखील दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. राज्यपाल सत्यपाल सिंह याआधीही वादग्रस्त विधानामुळे अनेकदा अडचणीत सापडले आहेत. दहशतवाद्यांच्या मृत्यूनं मला दु:ख होतं, असं वक्तव्य मलिक यांनी जानेवारीत केलं होतं. 'पोलीस आपलं काम अगदी व्यवस्थित करत आहेत. मात्र एक जरी जीव गेला, मग तो दहशतवाद्याचा का असेना, त्यानं मला दु:ख होतं,' असं मलिक म्हणाले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी