शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या मालमत्तेची होणार चौकशी, खट्टर सरकारने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 11:08 IST

२००५ ते २०१० या काळात गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या नावावर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.  

ठळक मुद्दे हरियाणामध्ये २००५ ते २०१४ या काळात भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली होते काँग्रेसचे सरकार या काळात काँग्रेसच्या अनेक ट्र्स्ट आणि गांधी-नेहरू कुटुंबासाठी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवण्यात आल्याचा आरोप केंद्र सरकारच्या पत्रानंतर गांधी-नेहरू कुटुंबाच्या इतर मालमत्तेच्या तपासाच्या चौकशीचे आदेश

चंदिगड - हरियाणा सरकारने गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या राज्यात असलेल्या मालमत्तेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. राज्याचे मुख्य सचिव केशनी आनंद आरोडा यांच्यावतीने हरियाणामधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था विभागाला हा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २००५ ते २०१० या काळात गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या नावावर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.  

 हरियाणामध्ये २००५ ते २०१४ या काळात भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. या काळात काँग्रेसच्या अनेक ट्र्स्ट आणि गांधी-नेहरू कुटुंबासाठी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवण्यात आल्याचा आरोप आहे. यापैकी काही मातमत्तांची आधीपासून चौकशी सुरू आहे. आता केंद्र सरकारच्या पत्रानंतर गांधी-नेहरू कुटुंबाच्या इतर मालमत्तेच्या तपासाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

यासाठी एका समितीकडे तपास सोपवण्यात आला असून, ही समिती राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या व्यवहारांचा तपास करणार आहे. यामध्ये मनी लाँड्रिंग आणि परदेशातून आलेल्या देणग्यांसह अनेक कायद्यांच्या कथित उल्लंघानाच्या प्रकरणांचा तपास केला जाईल. दरम्यान, या तपास समितीचे नेतृत्व ईडीच्ये एक विशेष संचालक करतील.

 दरम्यान, या तपासावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. मोदींना वाटते की संपूर्ण जग त्यांच्यासारखे आहे. त्यांना वाटते की कुणाचीही किंमत असते किंवा त्याला घाबरवता येऊ शकते. मात्र जे सत्यासाठी लढतात त्यांना खरेदी करता येत नाही किंवा घाबरवता येत नाही, हे मोदी कधी समजी शकणार नाहीत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.

 

टॅग्स :haryana election 2019हरियाणा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीFamilyपरिवार