शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप

By बाळकृष्ण परब | Updated: January 26, 2021 19:41 IST

Farmer Protest : शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी गंभीर आरोप केले आहे.

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणामुळे तणावपूर्ण परिस्थिती आहे. आज सकाळी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाल्यावर या आंदोलनाला हिंसक वळण लागून शेतकरी आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत मुसंडी मारली. तसेच लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवला. दरम्यान, शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी गंभीर आरोप केले आहे.आज शेतकरी आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराचा कट हा शीख फॉर जस्टीस या संघटनेने रचला होता, असा आरोप रवनीत सिंह बिट्टू यांनी केला आहे. तसेच लाल किल्ल्यावर झालेल्या आंदोलनात अभिनेता दीप सिद्धूचा हात होता असा दावाही बिट्टू यांनी केला आहे. तसेच धार्मिक ध्वज हा केशरी असतो, पिवळा नसतो, असे सांगत रवनीत सिंह बिट्टू यांनी लाल किल्ल्यावर फडकवलेल्या ध्वजाबाबतही मोठा दावा केला आहे. 

दरम्यान, आज दिवसभर सुरू असलेल्या तणावादरम्यान, दिल्लीत अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले. अनेक ठिकाणी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले. तसेच आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडवल्याने तणावामध्ये अधिकच भर पडली होती.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण