शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खडसेंनी घरातील धुणी रस्त्यावर आणू नये; फडणवीस यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 07:04 IST

मराठा आरक्षण स्थगितीस राज्य जबाबदार

नवी दिल्ली : भाजप नेते एकनाथ खडसे यांना मनीष भंगाळेप्रकरणी नव्हे, तर एमआयडीसी जमिनीसंदर्भात राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. घरची धुणी रस्त्यावर आणू नये, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे व त्यांच्या समर्थकांना चिमटे काढले.

एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना खडसे यांनी एमआयडीसी भूखंडाचा मुद्दा अधोरेखित केला. फडणवीस म्हणाले, ‘खडसेंना एमआयडीसी जमिनीसंदर्भात राजीनामा द्यावा लागला. तेव्हा मी समिती नेमली. अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. उच्च न्यायालयाने तो नाकारला. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे लोकांमध्ये खडसे यांनी गैरसमज परसवू नये. घरातील वाद घरातच चर्चेने संपवू.’

केंद्राचा संबंध नाहीच

मराठा आरक्षणाशी केंद्राचा संबंध नाही. कारण केंद्र याप्रकरणी पक्ष नाही. सत्ताधाऱ्यांना मात्र काहीही झाले तरी केंद्र सरकारच दिसते. १०२ व १०३ व्या सुधारणेनंतर केंद्राला पक्ष करणे योग्यही नव्हते. शिवाय मागील सरकारमधील मंत्र्यांनीच आताही बाजू मांडली. नामांकित वकील होते. राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची होती.

राज्य नेतृत्वाला क्षणोक्षणी निर्णय घ्यावा लागतो. मी मुख्यमंत्री असताना स्ट्रॅटेजी आखली, सतत माहिती घ्यायचो. पाठपुरावा करायचो. अर्थात, सरकारने बोध घ्यावा व घटनापीठाकडे तात्काळ दाद मागावी. कोरोनामुळे भरती थांबवून एक प्रकारे राज्याने न्यायालयास तयारी दाखवून मोठी चूक केली. खूप प्रयत्न करून मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. न्यायालयाने ते वैध ठरवले होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपा