शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी काय पण! केरळच्या मुसळधार पावसात जोडपं अडकलं; टोपात बसून मंडपात पोहचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:41 IST

Kerala rains flood bride and groom use cauldron : केरळमध्ये जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत असताना आपल्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी एका जोडप्याने चक्क टोपात बसून लग्नमंडपात जाण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - केरळमध्ये अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामध्ये आतापर्यंत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोलून सर्व शक्य मदतीचे आश्वासन दिले आहे. पठाणमथिट्टाचा डोंगराळ भाग पावसामुळे-पुरामुळे अधिक प्रभावित झाला आहे. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाची टीम मदत कार्यात गुंतलेली आहेत. तिरुअनंतपुरम, कोल्लमसह 7 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. तर, पथानामथिट्टासह 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान एका हटके लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

केरळमध्ये जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत असताना आपल्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी एका जोडप्याने चक्क टोपात बसून लग्नमंडपात जाण्याचा निर्णय घेतला. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळेच लग्नमंडपात जाणं अवघड झालं होतं. अशा वेळी या जोडप्याने एक अनोखी शक्कल लढवली आणि टोपाचा उपयोग करून मंडप गाठला. याचा एक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

अनेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कुट्टनाड भागात राहणाऱ्या राहुल आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मुहूर्त काही दिवसांपूर्वीच ठरला होता. लग्नाची सर्व तयारी झाली होती. सर्व पाहुण्यांना आमंत्रणं देण्यात आलं होतं आणि कोरोनाचे नियम पाळत लग्न करण्याचं नियोजन झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अऩेक भागात पूरस्थिती आली आणि रस्ते पाण्याखाली गेले. लग्नाच्या दिवशी देखील मुसळधार पाऊस कोसळत होता. 

पुराच्या पाण्यात टोपातून लग्नमंडपात पोहोचले

रस्त्यावर कमरेएवढं पाणी होतं. त्यामुळे कोणतंही वाहन जाऊ शकत नव्हतं. अशावेळी जोडप्याने आजच लग्न करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी शक्कल लढवली. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा एक मोठा टोप घेतला. त्यात दोघंही बसले आणि पुराच्या पाण्यात पातेल्यातून लग्नमंडपात पोहोचले. या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल