शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

धक्कादायक! भारतातील हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत, परिस्थिती अशीच राहिली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:50 IST

Kerala population: जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही असं एक राज्यं आहे जे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. चांगली शिक्षणाची स्थिती, रोजगाराच्या उत्तम संधी आणि उच्च दरडोई उत्पन्न यामुळे या राज्यातील जीवनमान हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम असं आहे. तरीही या राज्यातील लोकसंख्या सातत्याने घटत आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत गेली आहे. आजघडीला भारत हा जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश बनला आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला लगाम घालणं हे देशासमोरील मोठं आव्हान बनलेलं आहे. दुसरीकडे जपान आणि युरोपमधील काही देश हे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही असं एक राज्यं आहे जे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. चांगली शिक्षणाची स्थिती, रोजगाराच्या उत्तम संधी आणि उच्च दरडोई उत्पन्न यामुळे या राज्यातील जीवनमान हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम असं आहे. तरीही या राज्यातील लोकसंख्या सातत्याने घटत आहे.

भारतातील देवभूमी समजलं जाणारं केरळ हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. २०२४ मध्ये केरळची लोकसंख्या ही ३ कोटी ६० लाख होती. तत्पूर्वी १९९१ मध्ये केरळची लोकसंख्या ही २ कोटी ९० लाख होती. म्हणजेच मागच्या ३५ वर्षांत केरळी लोकसंख्या ही जेमतेम ७० लाख एवढी वाढली. २०११ जनगणनेनुसार केरळची लोकसंख्या ही ३ कोटी ३४ लाख एवढी होती. म्हणजेच केरळ हे राज्य स्थिर लोकसंख्येचं उद्दिष्ट गाठण्यात जवळपास गाठलं आहे.

द हिंदू या वृत्तपत्रामधीस अहवालानुसार कोरोनाच्या साथीनंतर केरळमधील स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. आधी राज्यामध्ये दरवर्षी ५ ते ५ लाख ५० हजार मुलांचा जन्म व्हायचा. मात्र २०२३ मध्ये हा आकडा घटून ३ लाख ९३ हजार २३१ एवढा खाली आला आहे. केरळच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. लोकसंख्येच्या बाबतीत केरळची स्थिती ही २०१८ नंतर वेगाने बिघडली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २०२१ मध्ये केरळमध्ये जन्मणाऱ्या मुलांची संख्या घटून ती ४ लाख १९ हजार ७६७ वर आली होती. आता २०२३ मधील समोर आलेली आकडेवारी अधिकच चिंताजनक आहे.

लोकसंख्या तज्ज्ञांच्या मते लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी जननदर हा २.१ एवढाअसला पाहिजे. म्हणजेच प्रति महिला किमान २.१ मुले जन्माला आली पाहिजेत. केरळने हे लक्ष्य १९८७-८८ मध्येच साध्य केलं होतं. मागच्या तीन दशकांपासून केरळची लोकसंख्या स्थिर आहे. मात्र जन्माला येणाऱ्या मुलांची घटनी संख्या चिंता वाढवत आहे.

१९८७-८८ मध्ये केरळमधील जननदर हा २.१ होता. त्यानंतर तो सातत्याने घटत गेला. १९९१ मध्ये तो १.८ ते १.७ एवढा खाली आला. तर २०२० मध्ये तो १.५ वर आला. कर २०२३ मध्ये आणखी घटून १.३५ एवझा झाला. केरळमधील बहुतांश जोडपी ही केवळ एका मुलाला जन्म देत आहेत. तर काहींकडून मुलं जन्माला घातली जात नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात केरळची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते.  

टॅग्स :KeralaकेरळIndiaभारतSocialसामाजिक