शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धक्कादायक! भारतातील हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत, परिस्थिती अशीच राहिली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:50 IST

Kerala population: जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही असं एक राज्यं आहे जे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. चांगली शिक्षणाची स्थिती, रोजगाराच्या उत्तम संधी आणि उच्च दरडोई उत्पन्न यामुळे या राज्यातील जीवनमान हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम असं आहे. तरीही या राज्यातील लोकसंख्या सातत्याने घटत आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत गेली आहे. आजघडीला भारत हा जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश बनला आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला लगाम घालणं हे देशासमोरील मोठं आव्हान बनलेलं आहे. दुसरीकडे जपान आणि युरोपमधील काही देश हे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही असं एक राज्यं आहे जे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. चांगली शिक्षणाची स्थिती, रोजगाराच्या उत्तम संधी आणि उच्च दरडोई उत्पन्न यामुळे या राज्यातील जीवनमान हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम असं आहे. तरीही या राज्यातील लोकसंख्या सातत्याने घटत आहे.

भारतातील देवभूमी समजलं जाणारं केरळ हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. २०२४ मध्ये केरळची लोकसंख्या ही ३ कोटी ६० लाख होती. तत्पूर्वी १९९१ मध्ये केरळची लोकसंख्या ही २ कोटी ९० लाख होती. म्हणजेच मागच्या ३५ वर्षांत केरळी लोकसंख्या ही जेमतेम ७० लाख एवढी वाढली. २०११ जनगणनेनुसार केरळची लोकसंख्या ही ३ कोटी ३४ लाख एवढी होती. म्हणजेच केरळ हे राज्य स्थिर लोकसंख्येचं उद्दिष्ट गाठण्यात जवळपास गाठलं आहे.

द हिंदू या वृत्तपत्रामधीस अहवालानुसार कोरोनाच्या साथीनंतर केरळमधील स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. आधी राज्यामध्ये दरवर्षी ५ ते ५ लाख ५० हजार मुलांचा जन्म व्हायचा. मात्र २०२३ मध्ये हा आकडा घटून ३ लाख ९३ हजार २३१ एवढा खाली आला आहे. केरळच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. लोकसंख्येच्या बाबतीत केरळची स्थिती ही २०१८ नंतर वेगाने बिघडली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २०२१ मध्ये केरळमध्ये जन्मणाऱ्या मुलांची संख्या घटून ती ४ लाख १९ हजार ७६७ वर आली होती. आता २०२३ मधील समोर आलेली आकडेवारी अधिकच चिंताजनक आहे.

लोकसंख्या तज्ज्ञांच्या मते लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी जननदर हा २.१ एवढाअसला पाहिजे. म्हणजेच प्रति महिला किमान २.१ मुले जन्माला आली पाहिजेत. केरळने हे लक्ष्य १९८७-८८ मध्येच साध्य केलं होतं. मागच्या तीन दशकांपासून केरळची लोकसंख्या स्थिर आहे. मात्र जन्माला येणाऱ्या मुलांची घटनी संख्या चिंता वाढवत आहे.

१९८७-८८ मध्ये केरळमधील जननदर हा २.१ होता. त्यानंतर तो सातत्याने घटत गेला. १९९१ मध्ये तो १.८ ते १.७ एवढा खाली आला. तर २०२० मध्ये तो १.५ वर आला. कर २०२३ मध्ये आणखी घटून १.३५ एवझा झाला. केरळमधील बहुतांश जोडपी ही केवळ एका मुलाला जन्म देत आहेत. तर काहींकडून मुलं जन्माला घातली जात नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात केरळची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते.  

टॅग्स :KeralaकेरळIndiaभारतSocialसामाजिक