शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

धक्कादायक! भारतातील हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत, परिस्थिती अशीच राहिली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:50 IST

Kerala population: जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही असं एक राज्यं आहे जे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. चांगली शिक्षणाची स्थिती, रोजगाराच्या उत्तम संधी आणि उच्च दरडोई उत्पन्न यामुळे या राज्यातील जीवनमान हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम असं आहे. तरीही या राज्यातील लोकसंख्या सातत्याने घटत आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत गेली आहे. आजघडीला भारत हा जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश बनला आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला लगाम घालणं हे देशासमोरील मोठं आव्हान बनलेलं आहे. दुसरीकडे जपान आणि युरोपमधील काही देश हे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही असं एक राज्यं आहे जे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. चांगली शिक्षणाची स्थिती, रोजगाराच्या उत्तम संधी आणि उच्च दरडोई उत्पन्न यामुळे या राज्यातील जीवनमान हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम असं आहे. तरीही या राज्यातील लोकसंख्या सातत्याने घटत आहे.

भारतातील देवभूमी समजलं जाणारं केरळ हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. २०२४ मध्ये केरळची लोकसंख्या ही ३ कोटी ६० लाख होती. तत्पूर्वी १९९१ मध्ये केरळची लोकसंख्या ही २ कोटी ९० लाख होती. म्हणजेच मागच्या ३५ वर्षांत केरळी लोकसंख्या ही जेमतेम ७० लाख एवढी वाढली. २०११ जनगणनेनुसार केरळची लोकसंख्या ही ३ कोटी ३४ लाख एवढी होती. म्हणजेच केरळ हे राज्य स्थिर लोकसंख्येचं उद्दिष्ट गाठण्यात जवळपास गाठलं आहे.

द हिंदू या वृत्तपत्रामधीस अहवालानुसार कोरोनाच्या साथीनंतर केरळमधील स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. आधी राज्यामध्ये दरवर्षी ५ ते ५ लाख ५० हजार मुलांचा जन्म व्हायचा. मात्र २०२३ मध्ये हा आकडा घटून ३ लाख ९३ हजार २३१ एवढा खाली आला आहे. केरळच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. लोकसंख्येच्या बाबतीत केरळची स्थिती ही २०१८ नंतर वेगाने बिघडली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २०२१ मध्ये केरळमध्ये जन्मणाऱ्या मुलांची संख्या घटून ती ४ लाख १९ हजार ७६७ वर आली होती. आता २०२३ मधील समोर आलेली आकडेवारी अधिकच चिंताजनक आहे.

लोकसंख्या तज्ज्ञांच्या मते लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी जननदर हा २.१ एवढाअसला पाहिजे. म्हणजेच प्रति महिला किमान २.१ मुले जन्माला आली पाहिजेत. केरळने हे लक्ष्य १९८७-८८ मध्येच साध्य केलं होतं. मागच्या तीन दशकांपासून केरळची लोकसंख्या स्थिर आहे. मात्र जन्माला येणाऱ्या मुलांची घटनी संख्या चिंता वाढवत आहे.

१९८७-८८ मध्ये केरळमधील जननदर हा २.१ होता. त्यानंतर तो सातत्याने घटत गेला. १९९१ मध्ये तो १.८ ते १.७ एवढा खाली आला. तर २०२० मध्ये तो १.५ वर आला. कर २०२३ मध्ये आणखी घटून १.३५ एवझा झाला. केरळमधील बहुतांश जोडपी ही केवळ एका मुलाला जन्म देत आहेत. तर काहींकडून मुलं जन्माला घातली जात नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात केरळची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते.  

टॅग्स :KeralaकेरळIndiaभारतSocialसामाजिक