शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केरळ लव्ह जिहाद प्रकरण - 'मुलीची इच्छा महत्वाची, न्यायालयात हजर करा', सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 16:41 IST

केरळमधील बहुचर्चित 'लव्ह जिहाद' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुलीच्या वडिलांना 27 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीदरम्यान मुलीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने सांगितलं आहे की, न्यायालय हादियासोबत (तरुणी) चर्चा करुन तिची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.

ठळक मुद्देकेरळमधील बहुचर्चित 'लव्ह जिहाद' प्रकरणी न्यायालय तरुणीसोबत चर्चा करुन मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणारतरुणीच्या वडिलांना 27 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीदरम्यान तरुणीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने हादियाचा मुस्लिम तरुणासोबत झालेला विवाह रद्द करत, तिला वडिलांच्या हवाली करण्याचा आदेश दिला होता

नवी दिल्ली - केरळमधील बहुचर्चित 'लव्ह जिहाद' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तरुणीच्या वडिलांना 27 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीदरम्यान तरुणीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने सांगितलं आहे की, न्यायालय हादियासोबत (तरुणी) चर्चा करुन तिची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. केरळ उच्च न्यायालयाने हादियाचा मुस्लिम तरुणासोबत झालेला विवाह रद्द करत, तिला वडिलांच्या हवाली करण्याचा आदेश दिला होता.  

सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, 'तरुणी सज्ञान आहे आणि तिची इच्छा महत्वाची आहे. सज्ञान असल्याने तिला कोणासोबतही जाण्याचं स्वातंत्र्य आहे'. उत्तरादाखल एनआयएने माहिती दिली की, केरळमध्ये जवळपास 89 प्रकरणांमध्ये एकाच प्रकारचा खास पॅटर्न असल्याचं समोर आलं आहे. 

अॅडिशनल सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांनीही सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, एनआयएच्या तपासात एका खास वयोगटातील तरुणांना टार्गेट करुन जिहादसाठी कट्टर बनवण्याचा प्रयत्न केलं जात असल्याचं समोर आल्याची माहिती दिली. 'जेव्हा एखाद्या व्यक्तीला इतकं प्रभावित केलं जातं, की ती व्यक्ती आपला धर्म आणि आई-वडिलांचा तिरस्कार करु लागते तेव्हा तो किंवा ती आपल्या इच्छेने हे सर्व करत आहे म्हणणं योग्य नाही', असंही सिंग यांनी सांगितलं. यावर सर्वोच्च न्यायालयाने आपण तरुणीशी खुल्या कोर्टात चर्चा करुन मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करु असं सांगितलं. जर तरुणीला फूस लावून मन वळवण्यात आल्याचं निष्पन्न झाल्यास तपासाचा आदेश देण्यात येईल असंही न्यायालायने सांगितलं आहे. 

अखिला अशोकन उर्फ हादियाने धर्मपरिवर्तन करत शफीन जहानशी निकाह केला होता. यानंतर हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेच हादियाचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं असून, शफीनचे इसीसशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत विवाह रद्द केला होता आणि हादियाला वडिलांकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. 

यानंतर शफीनने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले होते.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय