शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

केरळ :मशिदीत पार पडला हिंदू जोडप्याचा विवाह समारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 04:31 IST

केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील कायमकुल गावांतील मुस्लिम बांधवांनी मशिदीत एका हिंदू जोडप्याचा विवाह लावून देत अवघ्या जगाला सांप्रदायिक, सामाजिक सलोख्याचे अद्वितीय उदहारण घालून देत एकतेचा संदेश दिला.

केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील कायमकुल गावांतील मुस्लिम बांधवांनी मशिदीत एका हिंदू जोडप्याचा विवाह लावून देत अवघ्या जगाला सांप्रदायिक, सामाजिक सलोख्याचे अद्वितीय उदहारण घालून देत एकतेचा संदेश दिला.हा अभूतपूर्व विवाह समारंभ गावातील जुन्या चेरावल्ली जमात मशिदीत हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार मोठ्या आनंदात पार पडला.वधु अंजूचे वडिल अशोक कुमार (४९) यांचे अचानक निधन झाले. मुलीचे लग्न कसं करायचं? याची चिंता अंजुच्या आईला लागली होती. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती. अंजुचे वडील अशोक कुमार आणि जमातचे सचिव नजमुद्दीन यांची मैत्री होती. अंजुच्या आईने नजमुद्दीन यांना मदतीसाठी विनंती केली. त्यांनीही कुठलीही सबब पुढे न करता तयारी दाखविली आणि मशिद समितीपुढे अंजुचे लग्न लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. समितीनेही सामाजिक बांधिलकी आणि मानवतेच्या दृष्टीने संमती दिली आणि अंजुचा विवाह समारंभ मशिदीत हिंदू धर्माच्या रितीरिवाजानुसार पूजा, हवन आदी मंगलविधिसह पार पडला.शरत शशि आणि अंजु या नवदाम्पत्यांना शुभार्शीवाद देण्यासाठी आलेल्या ४ हजार पाहुण्यांना शाकाहारी भोजनाची पंगतही देण्यात आली. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर वधु-वराने मशिदीचे इमाम रियासुद्दीन फैजी यांचे आशीर्वाद घेतले. चेरावल्ली मुस्लिम जमात कमिटीने वधु-वराला सोन्याची दहा नाणे, दोन लाख रुपये रोख, तसेच टीव्ही, फ्रीज आणि फर्निचरसह संसारोपयोगी वस्तू भेट म्हणूनदिल्या.असे विवाह किंवा समारंभ मंदीर, चर्च, गुरुद्वारात का होऊ शकत नाहीत? ही सर्व धार्मिक ठिकाणे सर्वांसाठी खुले का होत नाहीत? एक-दुसऱ्याच्या रितीरिवांजांचा आदर का करीत नाही? दुर्दैवाने धर्माच्या नावावर शतकांपासून संकुचित राजकारण केले जात आहे. धर्माच्या नावाने काही लोक समाजात तेढ निर्माण करीत आहेत. आपसांत लढवून एक-दुसºयाला कमी लेखतात, असे चित्र असतांना मशिदीत हिंदु जोडप्याचा विवाह लावून मल्याळी मुस्लिम समुदायाने आम्ही भारतीय असल्याचे दाखवून दिले.- डॉ. वेदप्रताप वैदिकया अद्वितीय विवाह सोहळ्यातून मल्याळी मुस्लिम समाज किती महान, मोठ्या मनाचा आणि किती मानवतावादी आहे, हे सिद्ध केले. सोबतच मानवता आणि एकतेचा संदेशही दिला.

 

टॅग्स :marriageलग्नKeralaकेरळ