शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Kerala Floods: शाबासकी, वाहवा मिळवित सैन्यदले केरळमधून माघारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:38 IST

सर्वात मोठी मोहीम : महाप्रलयात वाचविले हजारोंचे प्राण

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सलग १५ दिवसांच्या अतिवृष्टीने झालेल्या महाप्रलयात केलेल्या अतुलनीय मदत आणि बचाव कार्याबद्दल सर्वांकडून शाबासकी आणि वाहवा मिळवत तिन्ही सैन्यदलांनी रविवारपासून तेथे सुरु असलेले आपले मानवतावादी नागरी साह्याचे काम आटोपते घेतले. मात्र वैद्यकीय सेवा देण्यासाठी सैन्यदलांनी सुरु केलेल्या सुविधा आणखी काही दिवस सुरु राहतील. केरळ सरकारनेही औपचारिक निरोप समारंभ आयोदित करून या न भूतो आपत्तीत मदतीला धावून आल्याबद्दल सैन्यदलांचे आभार मानले.

केरळमधील मदत आणि बचाव कार्यासाठी हवाई दलाने ‘आॅपरेशन करुणा’, नौदलाने ‘आॅपरेशन मदद’ आणि भारतीय लष्कराने ‘आॅपरेशन राहत’ हाती घेतले होते. सैन्यदलांच्या इतिहासात तिन्ही दलांनी एकाचवेळी, एकाच ठिकाणी एकत्रितपणे हाती घेतलेलीे ही सर्वात मोठीे मानवतावादी मदतीची मोहीम होती. केवळ शत्रूपासूनच नव्हे तर कोपलेल्या निसर्गापासून संरक्षणासाठीही सैन्यदले तेवढ्यात तत्परतेने व सज्जतेने धावून येतात, असा आश्वासक संदेश यातून देशाला दिला गेला.

सैन्यदलाच्या दक्षिण कमांडने, नौदलाच्या पूर्व कमांडने आणि हवाई दलाच्या दक्षिण कमांडने सैन्यदलांच्या या समन्वित मोहिमांचे सूत्रसंचालन केले. दि. ८ आॅगस्ट रोजी राज्य सरकारकडून पहिला ‘अ‍ॅलर्ट’ मिळताच तिन्ही सैन्यदलांच्या मदत व बचाव तुकड्या लगेच धावून आल्या. परंतु त्यानंतर कित्येक दिवस राहिलेले खराब हवामान, डोंगराळ आणि दुर्गम भूप्रदेश आणि दाट लोकवस्तीचे भाग यामुळे हे काम दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक बनत गेले. भविष्यात या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी या मोहिमांच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास केला जाईल.

हवाई दलाच्या दक्षिण कमांडचे ध्वजाधिकारी एअर मार्सल बी, सुरेश, पंगोदे लष्करी केंद्राचे कमांडर ब्रिगेडियर सी. जी. अरुण, नौदलाच्या दक्षिण कमांडचे कमांडर एस. सनूज आणि तटरक्षक दलाचे कमाडंट व्ही. के. वर्गिस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आपापल्या दलांनी केलेल्या कामाची माहिती दिली. हे काम करताना नागरी प्रशासन व लोकांकडून जे प्रेम आणि सहकार्य मिळले त्याबद्दल त्यांनी आभार मानले. पूर ओसरल्याने आता विस्थापितांच्या पुनर्वसनाचे काम सुरु झाल्याने आम्ही आमचे काम आटोपते घेतले आहे, असेही हे अधिकारी म्हणाले.जवानांनी अशी केली कामगिरीहवाई दल: २६ हेलिकॉप्टर्सच्या साह्याने शेकडो लोकांची सुटका,1200 टन मदतसामुग्रीची वाहतूक व पुरवठा.भारतीय लष्कर: विविध कौशल्ये असलेल्या ६० मदत तुकड्या. २६ तात्पुरते पूल बांधले/मोडलेले दुरुस्त केले. वाहून गेलेले व दरडी कोसळून बंद झालेले ५० रस्ते वाहतुकीस खुले केले. पुरात अडकलेल्या १५ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले.नौदल: २० विमाने व हेलिकॉप्टरचा ताफा कार्यरत. १६,८४३ लोकांना बोटींमधून तर १,१७३ लोकांना हेलिकॉप्टरनी पूरातून बाहेर काढले.तट रक्षक दल: ३६ जहाजे व ३६ मदत पथके सक्रियतेने कार्यरत. १७ वैद्यकीय शिबिरे चालविली. १७७ टन मदतसामुग्री जागोजागी पोहोचविली.सशस्त्र दलाचे जवान केरळमधील मदत कार्याचे नायककेरळमधील पुराच्या संकटाचा सामना करणाऱ्या लोकांना मदत करणाºया सशस्त्र दलाचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, केरळमधील मदत कार्याचे नायक सशस्त्र दलाचे जवान आहेत. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांनी हे कौतुक केले.पण, कधीकधी ही अतिवृष्टी विनाशकारी पूर घेऊन येते. केरळमधील भीषण पुराने मोठे नुकसान झाले आहे. आज या कठीण परिस्थितीत पूर्ण देश केरळसोबत उभा आहे. जी मनुष्यहानी झाली आहे त्याची भरपाई होऊ शकत नाही. पण, त्या कुटुंबीयांना मी विश्वास देऊ इच्छितो की, सव्वाशे कोटी भारतीय आज आपल्यासोबत आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरSoldierसैनिकRainपाऊस