शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

Kerala Floods: केरळच्या नवनिर्माणासाठी यूएईचे ७०० कोटी नकोत, केंद्र सरकारचा 'स्वबळा'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 12:06 IST

केरळमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या केरळसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

तिरुअनंतपूरम- केरळमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या केरळसाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यूएईनं केरळला देऊ केलेली 700 कोटींची मदत केंद्र सरकारनं धुडकावली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि केरळ सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बुधवारी केंद्र सरकारनं केरळ पूरग्रस्तांना देण्यात आलेली परदेशी मदत नाकारली आहे. संयुक्त अरब अमिराती(यूएई)नं केरळच्या सहाय्यता निधीसाठी 700 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. केरळ राज्य ही मदत स्वीकारण्यास तयार आहे. परंतु केंद्र सरकारनं ही मदत नाकारली आहे.केंद्र सरकार या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी फक्त घरगुती प्रयत्न करण्याच्या विचारात आहे. काँग्रेसनं केंद्राच्या या कृतीचा निषेध नोंदवला आहे. तर केरळ सरकारनं 2016च्या राष्ट्रीय आपत्ती निवारणाचा हवाला देत सांगितलं आहे की, एखादा देश स्वेच्छेनं पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तयार असेल आणि त्या राज्याच्या सरकारला ते मान्य असेल. तर केंद्र सरकारही अशी मदत स्वीकारू शकतो. केंद्राबरोबर आमची चर्चा सुरू आहे, असंही केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे.  माजी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिलं पत्रकेरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. नियम असे असले पाहिजेत, जेणेकरून लोकांच्या अडचणी सोडवल्या जातील. त्यामुळे कोणी देशाला मदत करू इच्छित असल्यास ती दूर करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. 

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर