शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:16 IST

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे.  

तिरुअनंतपुरम, दि. 17 - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे.  मात्र, या बदलीचा आणि मोहन भागवत यांना ध्वजरोहणापासून रोखल्याच्या घटनेचा काहीही संबंध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नियमानुसार ही बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

नेमके काय आहे प्रकरण ?केरळमधील पलक्कड येथील एका सरकारी शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र परवानगी मिळाल्यानंतर भागवत यांनी ध्वजरोहण केले व स्वातंत्र्यदिनदेखील साजरा केला होता. स्वातंत्र्यदिनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखाकडून ध्वजरोहण केले जाऊ नये, अशी नोटीस पलक्कडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुट्टी यांनी काढली होती.  पलक्कडमध्ये सरसंघचालकांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजरोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच ही नोटीस काढण्यात आल्याची चर्चा होती.  

गेले काही महिने केरळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वातील सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. केरळमध्ये हे सरकार अस्तित्वात आल्यापासून गेल्या संघ कार्यकर्त्यांवरील हल्ले व हत्या प्रकरणातही वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.  

आणखी बातम्या वाचा

(रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ)(परवानगी मिळाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ध्वजारोहण)(विद्यार्थ्यांदेखत शिक्षिकेला जाळलं जिवंत)केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्याकेरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती.  राजेश असे या कार्यकर्त्याचे नाव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घरी जाताना त्याच्यावर येथील श्रीकार्यम परिसरात हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने राजेशवर हल्ला केला.  रुग्णालयात त्याला नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 20 वेळा चाकूने वार केले होते.  दरम्यान, राजेशच्या हत्येमागे सीपीआय-एमचा हात असल्याचा आरोप केरळचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कुमानाम राजशेखरन यांनी केला होता.  

टॅग्स :BJPभाजपा