शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:16 IST

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे.  

तिरुअनंतपुरम, दि. 17 - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखणारे पलक्कडचे जिल्हाधिकारी पी. मेरीकुट्टी यांची बदली करण्यात आली आहे.  मात्र, या बदलीचा आणि मोहन भागवत यांना ध्वजरोहणापासून रोखल्याच्या घटनेचा काहीही संबंध नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नियमानुसार ही बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

नेमके काय आहे प्रकरण ?केरळमधील पलक्कड येथील एका सरकारी शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांना स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहण करण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र परवानगी मिळाल्यानंतर भागवत यांनी ध्वजरोहण केले व स्वातंत्र्यदिनदेखील साजरा केला होता. स्वातंत्र्यदिनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखाकडून ध्वजरोहण केले जाऊ नये, अशी नोटीस पलक्कडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुट्टी यांनी काढली होती.  पलक्कडमध्ये सरसंघचालकांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजरोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच ही नोटीस काढण्यात आल्याची चर्चा होती.  

गेले काही महिने केरळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वातील सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. केरळमध्ये हे सरकार अस्तित्वात आल्यापासून गेल्या संघ कार्यकर्त्यांवरील हल्ले व हत्या प्रकरणातही वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.  

आणखी बातम्या वाचा

(रस्त्यावर नमाज रोखू शकत नाही तर, पोलीस स्थानकात जन्माष्टमी कशी थांबवू - योगी आदित्यनाथ)(परवानगी मिळाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं ध्वजारोहण)(विद्यार्थ्यांदेखत शिक्षिकेला जाळलं जिवंत)केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याची हत्याकेरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती.  राजेश असे या कार्यकर्त्याचे नाव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घरी जाताना त्याच्यावर येथील श्रीकार्यम परिसरात हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने राजेशवर हल्ला केला.  रुग्णालयात त्याला नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 20 वेळा चाकूने वार केले होते.  दरम्यान, राजेशच्या हत्येमागे सीपीआय-एमचा हात असल्याचा आरोप केरळचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कुमानाम राजशेखरन यांनी केला होता.  

टॅग्स :BJPभाजपा