शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
2
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
3
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
4
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
5
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
6
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
7
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
8
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
9
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
10
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
11
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
12
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
13
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
14
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
15
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
16
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
17
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
18
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
19
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
20
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा

योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी: पिनराई विजयन 

By देवेश फडके | Updated: February 26, 2021 12:10 IST

केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी आहेत, असे विधान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर पिनराई विजयन यांची टीकाराहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - पिनराई विजयनकेरळमध्ये उत्तर प्रदेशातील १५ टक्के स्थलांतरित मजूर - पिनराई विजयन

तिरुवनंतपूरम :केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी आहेत, असे विधान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे. (kerala cm pinarayi vijayan slams yogi adityanath and rahul gandhi)

वायनाड येथून खासदार असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र एकसमान आहे. याबाबीत त्यांचे एकमत आहे, असा दावा पिनराई विजयन यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही; राकेश टिकैत यांची टीका

राहुल गांधी यांनी माफी मागावी

सन १९९० पासूनच्या काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरत पिनराई विजयन यांनी त्यावर टीका केली. भारतातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रेरित केले गेले. काँग्रेसच्या कार्यकाळात लाखो शेतकऱ्यांचे रक्त सांडले. यासाठी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी पिनराई विजयन यांनी केली. राहुल गांधी केरळमध्ये येऊन अनपेक्षित हस्तक्षेप केले. देशाच्या इतर भागात सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत त्यांनी शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर चालवला. असे असले तरी राहुल गांधी यांच्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक आहे, असे ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशातील १५ टक्के स्थलांतरित मजूर 

योगी आदित्यनाथ म्हणतात प्रत्येक गोष्टीत केरळ मागे राहिला आहे. रोजगार नसल्याने येथील तरुण परदेशात जातात, असे योगी आदित्यनाथ म्हणतात. मात्र, केरळमधील १५ टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशातील असून, त्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. गेल्या पाच वर्षात केरळमध्ये एकही जातीय हिंसाचार झालेला नाही. पण उत्तर प्रदेशात काय स्थिती आहे? ते आपण पाहिले आहे. महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, असे प्रत्युत्तर देत पिनराई विजयन यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली. 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली काढली. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तिरुवनंतपूरम येथे बोलताना त्यांनी डाव्या सरकारवर टीका करताना रोजगार तसेच मच्छिमारांचा मुद्दा मांडला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणKeralaकेरळRahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसBJPभाजपा