शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
सारा खान झाली मिसेस पाठक! क्रिशसोबत बांधली लग्नगाठ; सासरे सुनील लहरी गैरहजर?
7
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
8
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
9
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
10
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
11
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
12
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
13
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
14
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
16
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
17
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
18
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
19
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
20
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी: पिनराई विजयन 

By देवेश फडके | Updated: February 26, 2021 12:10 IST

केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी आहेत, असे विधान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर पिनराई विजयन यांची टीकाराहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - पिनराई विजयनकेरळमध्ये उत्तर प्रदेशातील १५ टक्के स्थलांतरित मजूर - पिनराई विजयन

तिरुवनंतपूरम :केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी आहेत, असे विधान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे. (kerala cm pinarayi vijayan slams yogi adityanath and rahul gandhi)

वायनाड येथून खासदार असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र एकसमान आहे. याबाबीत त्यांचे एकमत आहे, असा दावा पिनराई विजयन यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही; राकेश टिकैत यांची टीका

राहुल गांधी यांनी माफी मागावी

सन १९९० पासूनच्या काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरत पिनराई विजयन यांनी त्यावर टीका केली. भारतातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रेरित केले गेले. काँग्रेसच्या कार्यकाळात लाखो शेतकऱ्यांचे रक्त सांडले. यासाठी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी पिनराई विजयन यांनी केली. राहुल गांधी केरळमध्ये येऊन अनपेक्षित हस्तक्षेप केले. देशाच्या इतर भागात सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत त्यांनी शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर चालवला. असे असले तरी राहुल गांधी यांच्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक आहे, असे ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशातील १५ टक्के स्थलांतरित मजूर 

योगी आदित्यनाथ म्हणतात प्रत्येक गोष्टीत केरळ मागे राहिला आहे. रोजगार नसल्याने येथील तरुण परदेशात जातात, असे योगी आदित्यनाथ म्हणतात. मात्र, केरळमधील १५ टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशातील असून, त्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. गेल्या पाच वर्षात केरळमध्ये एकही जातीय हिंसाचार झालेला नाही. पण उत्तर प्रदेशात काय स्थिती आहे? ते आपण पाहिले आहे. महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, असे प्रत्युत्तर देत पिनराई विजयन यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली. 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली काढली. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तिरुवनंतपूरम येथे बोलताना त्यांनी डाव्या सरकारवर टीका करताना रोजगार तसेच मच्छिमारांचा मुद्दा मांडला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणKeralaकेरळRahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसBJPभाजपा