शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी: पिनराई विजयन 

By देवेश फडके | Updated: February 26, 2021 12:10 IST

केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी आहेत, असे विधान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर पिनराई विजयन यांची टीकाराहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - पिनराई विजयनकेरळमध्ये उत्तर प्रदेशातील १५ टक्के स्थलांतरित मजूर - पिनराई विजयन

तिरुवनंतपूरम :केरळमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू वेग घेताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. योगी आदित्यनाथ आणि राहुल गांधी हे एकाच माळेचे मणी आहेत, असे विधान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे. (kerala cm pinarayi vijayan slams yogi adityanath and rahul gandhi)

वायनाड येथून खासदार असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र एकसमान आहे. याबाबीत त्यांचे एकमत आहे, असा दावा पिनराई विजयन यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही; राकेश टिकैत यांची टीका

राहुल गांधी यांनी माफी मागावी

सन १९९० पासूनच्या काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांना जबाबदार धरत पिनराई विजयन यांनी त्यावर टीका केली. भारतातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रेरित केले गेले. काँग्रेसच्या कार्यकाळात लाखो शेतकऱ्यांचे रक्त सांडले. यासाठी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी पिनराई विजयन यांनी केली. राहुल गांधी केरळमध्ये येऊन अनपेक्षित हस्तक्षेप केले. देशाच्या इतर भागात सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत त्यांनी शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर चालवला. असे असले तरी राहुल गांधी यांच्या मनाच्या मोठेपणाचं कौतुक आहे, असे ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशातील १५ टक्के स्थलांतरित मजूर 

योगी आदित्यनाथ म्हणतात प्रत्येक गोष्टीत केरळ मागे राहिला आहे. रोजगार नसल्याने येथील तरुण परदेशात जातात, असे योगी आदित्यनाथ म्हणतात. मात्र, केरळमधील १५ टक्के स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशातील असून, त्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत. गेल्या पाच वर्षात केरळमध्ये एकही जातीय हिंसाचार झालेला नाही. पण उत्तर प्रदेशात काय स्थिती आहे? ते आपण पाहिले आहे. महिलांवरील अत्याचारात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे, असे प्रत्युत्तर देत पिनराई विजयन यांनी योगी आदित्यनाथांवर टीका केली. 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली काढली. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. तिरुवनंतपूरम येथे बोलताना त्यांनी डाव्या सरकारवर टीका करताना रोजगार तसेच मच्छिमारांचा मुद्दा मांडला होता.

टॅग्स :PoliticsराजकारणKeralaकेरळRahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसBJPभाजपा