शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुळेच केजरीवाल जेलमध्ये; 'INDIA' आघाडीतील घटक पक्षाचा राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 16:06 IST

Loksabha Election 2024: रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीनं अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या निषेधार्थ महारॅलीचं आयोजन केले. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी इंडिया आघाडीतील घटक पक्ष सीपीआय(M) ने केजरीवालांच्या अटकेसाठी काँग्रेसला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 

कोझिकोड - Pinarayi Vijayan on Rahul Gandhi ( Marathi News ) दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनिषेधार्थ इंडिया आघाडीनं रामलीला मैदानात लोकशाही बचाओ महारॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या दुसऱ्याच दिवशी इंडिया आघाडीतील घटक पक्षाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसकडूनअरविंद केजरीवालांवर आरोप करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसनेच दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केला. विशेष म्हणजे दिल्लीच्या महारॅलीत राहुल गांधी यांच्यासोबत सीपीआय(M) चे महासचिव सीताराम येचुरीही सहभागी होते. 

मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलं की, वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी पुन्हा निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या सीपीआयचा उमेदवार मैदानात आहे. राहुल गांधी काँग्रेसचे मोठे नेते आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. पण वायनाडमध्ये ते कोणाविरोधात लढाई लढतायेत हे पाहा. त्याठिकाणी सीपीआयचे एनी राजाविरोधात राहुल गांधी उभे आहेत. काँग्रेस आणि सीपीआय इंडिया आघाडीचा भाग आहे. मात्र ते भाजपाशी लढण्याऐवजी सीपीआयच्या उमेदवाराला आव्हान देत आहेत असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, वायनाडमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवून भाजपाने खेळी खेळली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बीडीजेएसने एकत्रित निवडणूक लढली होती. त्यावेळी तुषार वेल्लापल्ली त्यांचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर होते. त्यांना जवळपास ७८ हजार मते मिळाली होती जी ७.२५ टक्के होती. तर राहुल गांधींना ४ लाख ३१ हजाराहून अधिक मतदान झाले होते. मोठ्या मताधिक्यांनी त्यांनी ही जागा जिंकली. 

राहुल गांधींनी साधला होता भाजपावर निशाणा

रविवारी दिल्लीत झालेल्या महारॅलीत राहुल गांधींनी भाजपावर आरोप केला होता. पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचं सारा देश आणि भाजपाचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूक आयोगातील दोन पंचही त्यांनीच निवडले. सामना सुरु होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकले. ही मॅच फिक्सिंग मोदी आणि भारतातील तीनचार सर्वात मोठे उद्योगपती करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल