शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 20:29 IST

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मतदारसंघातच काँग्रेसला धक्का बसला असून, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency)

ठळक मुद्देवायनाडमधून काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा राजीनामाराहुल गांधींना मोठा धक्का असल्याची राजकीय वर्तुळात चर्चापक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा नेते, पदाधिकाऱ्यांचा दावा

कोची : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Kerala Assembly Election 2021) राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि वायनाड येथून खासदार असलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) केरळ दौऱ्यावर होते. मात्र, राहुल गांधी यांच्या मतदारसंघातच काँग्रेसला धक्का बसला असून, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यावेळी वायनाड मतदारसंघाने राहुल गांधी यांना पाठिंबा देत मोठ्या मतांनी विजयी केले होते. काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाड मतदारसंघामधून चार प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल गांधींसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला

राहुल गांधींना मोठा धक्का

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांमध्ये केरळचे प्रदेश काँग्रेस समिती सचिव एम. एस. विश्वनाथन, महिला काँग्रेस राज्य सचिव सुजया वेणुगोपाल, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीस पी. के. अनिल कुमार आणि केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य के. के. विश्वनाथन यांचा समावेश आहे. या नेत्यांनी काँग्रेसविरोधी माकपमध्ये जाण्याचे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे भावी पक्षाध्यक्ष आणि काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाणारे राहुल गांधी यांच्यासाठी वायनाडमध्ये हा मोठा फटका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे समजते. 

पक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा

वाडनाड जिल्ह्यात काँग्रेस नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच नेते, पदाधिकाऱ्यांकडे पक्षाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असे प्रदेश काँग्रेस समिती सचिव एम. एस. विश्वनाथन यांनी सांगितले. तर, वाडनाडमध्ये केवळ तीन जणच पक्ष चालवत आहेत. बाकीच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना किंमत दिली जात नाही, असा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य के. के. विश्वनाथन यांनी केला आहे. 

दरम्यान, माकपचे नेते इ. ए. शंकरन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आदिवासी क्षेमा समितीचे ते राज्य सचिव असल्यामुळे मोठी व्होटबँक काँग्रेसच्या पाठिशी उभी राहू शकते, असे म्हटले जात आहे. केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानाची मतमोजणी मात्र थेट २ मे रोजी होणार आहे. 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडcongressकाँग्रेसPoliticsराजकारण