शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राहुल गांधींना धक्का! वायनाडमध्येच काँग्रेसला गळती; ४ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 20:29 IST

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मतदारसंघातच काँग्रेसला धक्का बसला असून, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency)

ठळक मुद्देवायनाडमधून काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा राजीनामाराहुल गांधींना मोठा धक्का असल्याची राजकीय वर्तुळात चर्चापक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा नेते, पदाधिकाऱ्यांचा दावा

कोची : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुच्चेरी, आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Kerala Assembly Election 2021) राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि वायनाड येथून खासदार असलेले राहुल गांधी (Rahul Gandhi) केरळ दौऱ्यावर होते. मात्र, राहुल गांधी यांच्या मतदारसंघातच काँग्रेसला धक्का बसला असून, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, त्यावेळी वायनाड मतदारसंघाने राहुल गांधी यांना पाठिंबा देत मोठ्या मतांनी विजयी केले होते. काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाड मतदारसंघामधून चार प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. राहुल गांधींसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला

राहुल गांधींना मोठा धक्का

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांमध्ये केरळचे प्रदेश काँग्रेस समिती सचिव एम. एस. विश्वनाथन, महिला काँग्रेस राज्य सचिव सुजया वेणुगोपाल, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे सरचिटणीस पी. के. अनिल कुमार आणि केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य के. के. विश्वनाथन यांचा समावेश आहे. या नेत्यांनी काँग्रेसविरोधी माकपमध्ये जाण्याचे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे भावी पक्षाध्यक्ष आणि काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जाणारे राहुल गांधी यांच्यासाठी वायनाडमध्ये हा मोठा फटका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे समजते. 

पक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा दावा

वाडनाड जिल्ह्यात काँग्रेस नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच नेते, पदाधिकाऱ्यांकडे पक्षाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असे प्रदेश काँग्रेस समिती सचिव एम. एस. विश्वनाथन यांनी सांगितले. तर, वाडनाडमध्ये केवळ तीन जणच पक्ष चालवत आहेत. बाकीच्या सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना किंमत दिली जात नाही, असा आरोप प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य के. के. विश्वनाथन यांनी केला आहे. 

दरम्यान, माकपचे नेते इ. ए. शंकरन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आदिवासी क्षेमा समितीचे ते राज्य सचिव असल्यामुळे मोठी व्होटबँक काँग्रेसच्या पाठिशी उभी राहू शकते, असे म्हटले जात आहे. केरळमध्ये ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या मतदानाची मतमोजणी मात्र थेट २ मे रोजी होणार आहे. 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडcongressकाँग्रेसPoliticsराजकारण