शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

केरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 02:32 IST

चहा मळ्यातील दुर्घटना : ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले

इदुक्की (केरळ) : केरळमधील मुन्नार या पर्यटकांच्या लोकप्रिय शहराजवळ असलेल्या एका चहाच्या मळ्यात कामगारांच्या निवासी चाळींवर शुक्रवारी पहाटे प्रचंड मोठी दरड कोसळून किमान १५ जण झोपेतच मृत्युमुखी पडले. माती व दगडांच्या ढिगाऱ्यांखाली आणखी किमान ५६ लोक दबलेले असावेत, अशी भीती व्यक्त करण्यात येत असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुन्नार शहराला लागूनच असलेल्या कानन देवन हिल प्लान्टेशन कंपनीच्या न्यायमकड चहामळ््यात ही दुर्घटना घडली. हा चहामळा पेत्तीमुडी डोंगराच्या उतारावर व त्याखालील सखल भागात आहे. डोंगराच्या पायथ्याशी कामगारांची वसाहत आहे. गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाने भूस्खलन होऊन या डोंगराचा खूप मोठा भाग निखळून खाली कामगारांच्या चाळींवर व आसपासच्या वसाहतींवर कोसळला. हे भूस्खलन एवढे प्रचंड होते की, कामगारांच्या चार चाळी व व त्यांशेजारी असलेले एक चर्च पूर्णपणे गाढले गेले. त्याखाली आणखी किमान ८० जण अडकलेले असावेत, असा अंदाज आहे. शनिवार दुपारपर्यंत माती व दगडांच्या ढिगाºयांखालून १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यात सहा महिला व तीन मुलांचा समावेश होता. याखेरीज आणखी १० जखमींनाही ढिगाºयांखालून काढून इस्पितळांत पाठविण्यात आले. रस्तामार्ग व दूरसंचार साधनेही बंद पडल्याने हवाईदलाने मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवावी, अशी विनंती केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी केली. (वृत्तसंस्था)पूल वाहून गेलाया चहामळ्याकडे येणाºया एकमेव रस्त्यावर असलेला कन्निमला नदीवरील पेरियावर पूल पुरामुळे वाहून गेल्याने मदत आणि बचाव पथकांना दुर्घटनास्थळी तातडीने पोहोचणे मुश्कील झाले.

टॅग्स :KeralaकेरळDeathमृत्यूRainपाऊस