शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

घटना किंवा संसदेनं दिल्लीला देशाची राजधानी म्हणून घोषित केलंय का?-केजरीवाल सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 09:36 IST

दिल्ली ही भारताची राजधानी आहे की नाही? यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली - दिल्ली ही भारताची राजधानी आहे की नाही? यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य  सरकारसाठी घटनात्मक व्यवस्थेअंतर्गत कार्यपालिकांचे जे विभाजन करण्यात आलेले आहे, हे नियम केंद्र शासित प्रदेशांवरही लागू होतात का?, अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं दिल्ली सरकार विरुद्ध केंद्र सरकार संबंधित प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान हा प्रश्न उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे, घटनेत किंवा संसदेनं पारित केलेल्या कायद्यानं दिल्लीला भारताची राजधानी म्हणून घोषित केले आहे का?,असा प्रश्न दिल्लीतील केजरीवाल सरकारनं सुप्रीम कोर्टात उपस्थित केला.  

दिल्ली सरकारचे वकील इंदिराजय सिंह यांनी सांगितले की, दिल्ली सरकारच्या कार्यपालिका अधिकारांना घटनात्मक योजने अंतर्गत पाहावं, ज्यात केंद्र आणि राज्य सरकाराच्या अधिकारांचं विभाजन निश्चित करण्यात आले आहे. इंदिराजय सिंह यांनी असेही सांगितले की, जर एका जहाजाला दोन कॅप्टन चालवतील तर व्यवस्थित चालणार नाही.  

कोर्टासमोर पुढे असेही सांगण्यात आले की, राजधानी कोणत्याही कायद्यातर्गत घोषित करण्यात आलेली नाही. उद्या केंद्र सरकार देशाची राजधानी दुसरीकडेही नेण्याचा निर्णय घेऊ शकते. शिवाय, देशाची राजधानी दिल्लीच असणार, असे घटनेत नमूद करण्यात आलेले नाही. ब्रिटिशांनी देशाची राजधानी कोलकाता बदलून दिल्ली केली , हे आपल्याला माहिती आहे.  नॅशनल कॅपिटल टेरिटरी अॅक्ट मात्र आहे पण हा कायदा दिल्लीला भारताची राजधानी असल्याचे सांगत नाही''. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवालNew Delhiनवी दिल्ली