शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:01 IST

AAP BJP Delhi Politics : सध्या तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक पत्र दिले. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

Kejriwal Government : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरले आहे, भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींची घेतलेली भेट! दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी आमदारांनी राष्ट्रपतींकडे केली. ते पत्र आता राष्ट्रपती भवनाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असून, दिल्लीतील सरकारच्या कारभाराबद्दल भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. तसे पत्र भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना दिले. 

ते पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयाकडे

दिल्लीतील केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजप आमदारांच्या पत्राची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन सचिवालयाने हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन सचिवालयाचे संचालक शिवेंद्र चतुर्वेदी यांनी कळवले आहे. 

भाजप आमदारांनी दिलेल्या पत्राला राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेले उत्तर.

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार?

केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे पत्र गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याच्या माहितीनंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याच्या चर्चेने डोके वर काढले आहे. सरकारचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवालच तुरुंगात असल्याचा मुद्दा भाजप आमदारांकडून मांडण्यात आलेला आहे. 

भाजप आमदारांनी ऑगस्टमध्ये घेतली होती राष्ट्रपतीची भेट

गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजप आमदारांनी राष्ट्रवादींना पत्र दिले होते. आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली. 

"मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे सरकार करू शकत नाहीये. पावसामुळे दिल्लीत पाणी तुंबत आहे. आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू झालेली नाही. हजारो कोटींचा निधी येणे बंद झाला आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे", विजेंद्र गुप्ता म्हणाले. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षAmit Shahअमित शाह