शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:01 IST

AAP BJP Delhi Politics : सध्या तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक पत्र दिले. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

Kejriwal Government : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरले आहे, भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींची घेतलेली भेट! दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी आमदारांनी राष्ट्रपतींकडे केली. ते पत्र आता राष्ट्रपती भवनाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असून, दिल्लीतील सरकारच्या कारभाराबद्दल भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. तसे पत्र भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना दिले. 

ते पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयाकडे

दिल्लीतील केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजप आमदारांच्या पत्राची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन सचिवालयाने हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन सचिवालयाचे संचालक शिवेंद्र चतुर्वेदी यांनी कळवले आहे. 

भाजप आमदारांनी दिलेल्या पत्राला राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेले उत्तर.

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार?

केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे पत्र गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याच्या माहितीनंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याच्या चर्चेने डोके वर काढले आहे. सरकारचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवालच तुरुंगात असल्याचा मुद्दा भाजप आमदारांकडून मांडण्यात आलेला आहे. 

भाजप आमदारांनी ऑगस्टमध्ये घेतली होती राष्ट्रपतीची भेट

गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजप आमदारांनी राष्ट्रवादींना पत्र दिले होते. आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली. 

"मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे सरकार करू शकत नाहीये. पावसामुळे दिल्लीत पाणी तुंबत आहे. आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू झालेली नाही. हजारो कोटींचा निधी येणे बंद झाला आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे", विजेंद्र गुप्ता म्हणाले. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षAmit Shahअमित शाह