शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:01 IST

AAP BJP Delhi Politics : सध्या तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक पत्र दिले. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

Kejriwal Government : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरले आहे, भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींची घेतलेली भेट! दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी आमदारांनी राष्ट्रपतींकडे केली. ते पत्र आता राष्ट्रपती भवनाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असून, दिल्लीतील सरकारच्या कारभाराबद्दल भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. तसे पत्र भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना दिले. 

ते पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयाकडे

दिल्लीतील केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजप आमदारांच्या पत्राची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन सचिवालयाने हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन सचिवालयाचे संचालक शिवेंद्र चतुर्वेदी यांनी कळवले आहे. 

भाजप आमदारांनी दिलेल्या पत्राला राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेले उत्तर.

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार?

केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे पत्र गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याच्या माहितीनंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याच्या चर्चेने डोके वर काढले आहे. सरकारचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवालच तुरुंगात असल्याचा मुद्दा भाजप आमदारांकडून मांडण्यात आलेला आहे. 

भाजप आमदारांनी ऑगस्टमध्ये घेतली होती राष्ट्रपतीची भेट

गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजप आमदारांनी राष्ट्रवादींना पत्र दिले होते. आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली. 

"मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे सरकार करू शकत नाहीये. पावसामुळे दिल्लीत पाणी तुंबत आहे. आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू झालेली नाही. हजारो कोटींचा निधी येणे बंद झाला आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे", विजेंद्र गुप्ता म्हणाले. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षAmit Shahअमित शाह