शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल सरकार संकटात? भाजप आमदारांचे 'ते' पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयालाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:01 IST

AAP BJP Delhi Politics : सध्या तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. अलिकडेच भाजपच्या आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन एक पत्र दिले. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

Kejriwal Government : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सरकार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरले आहे, भाजप नेत्यांनी राष्ट्रपतींची घेतलेली भेट! दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी आमदारांनी राष्ट्रपतींकडे केली. ते पत्र आता राष्ट्रपती भवनाने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असून, दिल्लीतील सरकारच्या कारभाराबद्दल भाजप आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन केली. तसे पत्र भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना दिले. 

ते पत्र राष्ट्रपतींनी पाठवले गृह मंत्रालयाकडे

दिल्लीतील केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे भाजप आमदारांच्या पत्राची राष्ट्रपती भवनाकडून दखल घेण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन सचिवालयाने हे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवले आहे. केंद्रीय गृह सचिवांना पत्र पाठवण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन सचिवालयाचे संचालक शिवेंद्र चतुर्वेदी यांनी कळवले आहे. 

भाजप आमदारांनी दिलेल्या पत्राला राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेले उत्तर.

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार?

केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणारे पत्र गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याच्या माहितीनंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागण्याच्या चर्चेने डोके वर काढले आहे. सरकारचे प्रमुख असलेले अरविंद केजरीवालच तुरुंगात असल्याचा मुद्दा भाजप आमदारांकडून मांडण्यात आलेला आहे. 

भाजप आमदारांनी ऑगस्टमध्ये घेतली होती राष्ट्रपतीची भेट

गेल्या महिन्यात ३० ऑगस्ट रोजी भाजप आमदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजप आमदारांनी राष्ट्रवादींना पत्र दिले होते. आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली. 

"मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत. त्यामुळे सरकार करू शकत नाहीये. पावसामुळे दिल्लीत पाणी तुंबत आहे. आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू झालेली नाही. हजारो कोटींचा निधी येणे बंद झाला आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे दिल्लीतील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे", विजेंद्र गुप्ता म्हणाले. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षAmit Shahअमित शाह