शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्र-मैत्रिणींना घरात ठेवणे क्रूरताच -उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:11 IST

Calcutta high court order: पतीचा आक्षेप असतानाही मित्रांना आणि माहेरच्या लोकांना घरात ठेवण्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. 

पत्नी आपल्या इच्छेविरोधात जाऊन घरी तिच्या मित्र परिवाराला आणि माहेरच्यांना घरी राहायला बोलवते. इतकंच नाही, आम्ही दोघेही घरी नसतो, तेव्हाही ते आमच्या घरीच राहतात, अशी फिर्याद घेऊन न्यायालयात पोहोचलेल्या पतीच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. पतीच्या इच्छेविरुद्ध असे करणे म्हणजे एक प्रकारची क्रूरताच आहे, असे न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना म्हटले. 

न्यायमूर्ती सब्यासाची भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 

घटस्फोटाचं प्रकरण उच्च न्यायालयात, कारण काय?

कोलकाता उच्च न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण आले. दोघाचे लग्न १५ डिसेंबर २००५ मध्ये झाले होते. पत्नी जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत राहत होती. २५ डिसेंबर २००८ रोजी पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्याच वर्षी २७ ऑक्टोबर रोजी पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

न्यायालयाने निकाल देताना काय म्हटले?

न्यायमूर्ती भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती कुमार यांच्या खंठपीठाने निकाल देताना म्हटले की, पत्नीकडून पतीसोबत असह्य व्यवहार होत असल्याचे पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळे घटस्फोट देणेच योग्य आहे. 

पतीच्या शासकीय निवासस्थानी त्याचा आक्षेप असताना महिलेने तिच्या मित्रमैत्रिणींना आणि माहेरच्या लोकांना घरात ठेवले. हे रेकॉर्डवरून सिद्ध होत आहे. कधी कधी पती-पत्नी घरी नसतानाही हे ललोक राहत होते, हे क्रूरतेच्याच कक्षेत येते, असे न्यायालयाने म्हटले. 

पत्नी खूप आधीपासून पतीसोबत वैवाहिक आयुष्य जगण्यास नकार देत आहे. दोघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून दुरावा निर्माण झाला असून, त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. २००५ ते २००८ पर्यंत पत्नी कोणतीही तक्रार न करता राहिली. लग्न झाल्यानंतर पत्नी तिच्या आईसोबत आणि मैत्रिणीसोबत राहत होती. यातून सिद्ध होतं की, पतीवर केलेले आरोप आधारहीन आहेत, असेही न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFamilyपरिवारCourtन्यायालयwest bengalपश्चिम बंगाल