शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

राम मंदिराचे वचन पाळा; संघाचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:57 IST

आज देशाची सत्ता चालविणाऱ्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे देशाला वचन दिले होते, हे विसरू नये, असा टोला मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ‘भय्याजी’ जोशी यांनी राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन केले.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : आज देशाची सत्ता चालविणाऱ्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे देशाला वचन दिले होते, हे विसरू नये, असा टोला मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ‘भय्याजी’ जोशी यांनी राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन रविवारी येथे केले.रामलीला मैदानावर विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या ‘धर्मसंसदे’त बोलताना जोशी म्हणाले की, देशाला रामराज्याची आस लागली आहे. आमचा कोणत्याही समाजाशी झगडा नाही. आम्ही राम मंदिरासाठी याचना करतो आहोत, असेही नाही. आज सत्तेत बसलेल्यांनी राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. देशातील जनतेच्याही तशाच तीव्र भावना आहेत. त्यामुळे सरकारने जनभावनांचा आदर आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, एवढेच आमचे म्हणणे आहे.जोशींखेरीज विहिंपचे अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे व त्यांचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांच्याखेरीज सर्वच वक्त्यांनी राम मंदिराची मागणी पूर्ण होईपर्यंत हे जनआंदोलन सुरूच ठेवण्याची ग्वाही दिली. गेल्या २५ नोव्हेंबरला विहिंपने अयोध्या, नागपूर व मंगळुरूसह देशात सात ठिकाणी अशाच धर्मसभांचे आयोजन केले होते. याच मालिकेतील शेवटची ‘धर्मसंसद’ ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी प्रयाग क्षेत्री व्हायची आहे.दबावासाठी शक्तिप्रदर्शनसंसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी विहिंपने राम मंदिरासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन केले. आयोजकांनी पाच लाख लोक आल्याचा दावा केला असला तरी रामलीला मैदानावर पार्किंग हटविले तर जास्तीत जास्त लाखभर लोक मावू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याखेरीज वाहतुकीवरही निर्बंध घातले होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपा