शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराचे वचन पाळा; संघाचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:57 IST

आज देशाची सत्ता चालविणाऱ्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे देशाला वचन दिले होते, हे विसरू नये, असा टोला मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ‘भय्याजी’ जोशी यांनी राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन केले.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : आज देशाची सत्ता चालविणाऱ्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याचे देशाला वचन दिले होते, हे विसरू नये, असा टोला मारत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ‘भय्याजी’ जोशी यांनी राम मंदिरासाठी केंद्र सरकारने कायदा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन रविवारी येथे केले.रामलीला मैदानावर विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या ‘धर्मसंसदे’त बोलताना जोशी म्हणाले की, देशाला रामराज्याची आस लागली आहे. आमचा कोणत्याही समाजाशी झगडा नाही. आम्ही राम मंदिरासाठी याचना करतो आहोत, असेही नाही. आज सत्तेत बसलेल्यांनी राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. देशातील जनतेच्याही तशाच तीव्र भावना आहेत. त्यामुळे सरकारने जनभावनांचा आदर आणि दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, एवढेच आमचे म्हणणे आहे.जोशींखेरीज विहिंपचे अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे व त्यांचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांच्याखेरीज सर्वच वक्त्यांनी राम मंदिराची मागणी पूर्ण होईपर्यंत हे जनआंदोलन सुरूच ठेवण्याची ग्वाही दिली. गेल्या २५ नोव्हेंबरला विहिंपने अयोध्या, नागपूर व मंगळुरूसह देशात सात ठिकाणी अशाच धर्मसभांचे आयोजन केले होते. याच मालिकेतील शेवटची ‘धर्मसंसद’ ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी प्रयाग क्षेत्री व्हायची आहे.दबावासाठी शक्तिप्रदर्शनसंसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस आधी विहिंपने राम मंदिरासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी हे शक्तिप्रदर्शन केले. आयोजकांनी पाच लाख लोक आल्याचा दावा केला असला तरी रामलीला मैदानावर पार्किंग हटविले तर जास्तीत जास्त लाखभर लोक मावू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याखेरीज वाहतुकीवरही निर्बंध घातले होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपा