शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

जेएनयू दोन वर्षे बंद ठेवून तिथे ''स्वच्छता अभियान'' राबवा, सुब्रह्मण्यम स्वामींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 11:59 IST

जेएनयूला जोपर्यंत दोन वर्षांसाठी बंद केले जात नाही तोपर्यंत हे विद्यापीठ सुधरणार नाही.

अहमदाबाद -  गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे देशातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक असलेले जेएनयू राजकीय केंद्र बनले आहे. जेएनयूमधील घडामोडींमुळे डाव्या आणि उजव्या विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष सध्या आमने-सामने आले असून, त्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी जेएनयूमध्ये बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांची तैनाती करण्याची मागणी केली आहे. तसेच जेएनयू दोन वर्षांसाठी बंद करून तिथे स्वच्छता अभियान राबवावे त्यानंतर हे विद्यापीठ सुरू करावे, असा सल्लाही स्वामी यांनी सरकारला दिला आहे.  

इंडस यूनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी हे अहमदाबादमध्ये आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्वामी म्हणाले की, ''सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक कॅम्पसच्या आत पोलीस ठाणे बनवले गेले पाहिजे. आज काही घटना घडली की पोलिसांना बोलवावे लागते. त्याला खूप वेळ लागतो. देशातील विद्यापीठांमध्ये पोलीस ठाणे असणे आवश्यक आहे. ही तरतूद केवळ जेएनयूसाठी करू नये. मात्र याची सुरुवात जेएनयूपासून करण्यात यावी. अमेरिकेमध्ये प्रत्येक विद्यापीठात एक पोलीस ठाणे असते. जेएनयूसाठी केवळ दिल्ली पोलीसच नाही. तर तिथे बीएसएफ आणि सीआरपीएफचासुद्धआ एक कॅम्प असला पाहिजे. '' 

जखमी झालेल्यांनीच हिंसाचार घडविला?, विद्यार्थी नेत्या आयशी घोषचाही समावेश 

जखमी झालेल्यांनीच हिंसाचार घडविला?, विद्यार्थी नेत्या आयशी घोषचाही समावेश

'या' बॉलीवूड डायरेक्टरने भाजप नेते मुरली मनोहर जोशींना म्हटले, देशद्रोहीजेएनयू दोन वर्षांसाठी बंद करून तिथे स्वच्छता अभियान राबवले गेले पाहिजे, त्यानंतर हे विद्यापीठ पुन्हा सुरू करण्यात यावे, असा सल्लाही स्वामींनी दिला, '' जेएनयूला जोपर्यंत दोन वर्षांसाठी बंद केले जात नाही तोपर्यंत हे विद्यापीठ सुधरणार नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात तिथे अशिक्षित आणि अयोग्य लोकांना मुद्दामहून प्रवेश दिला गेला आहे. जेएनयूमध्ये हॉस्टेलचे भाडे 10 रुपये आहे आणि तिथे 35 ते 40 या वयाचे विद्यार्थी आहेत, ते दरवर्षी नापास होत असतात. दिल्लीतील कॅम्पसमध्ये राहण्यासाठी एक जागा मिळावी आणि संपूर्ण देशभरात फिरून समाजवादी कार्यक्रमात सहभागी होता यावे, एवढीच येथील विद्यार्थ्यांचे धोरण असते,'' असे ते म्हणाले. ''जेएनयूमध्ये बहुतांश प्राध्यापक हे डाव्या विचारांचे आहेत. जे डाव्या विचारांचे नाहीत अशांना येथे येण्यापासून रोखण्यात येते.

अशाप्रकारच्या अनेक घटना घडूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे या विद्यापीठाला दोन वर्षांसाठी बंद केले पाहिजे. तसेच येथील चांगल्या विद्यार्थ्यंना दिल्ली विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठात प्रवेश दिला पाहिजे. तसेच उरलेल्या लोकांना हटवून सफाई अभियान सुरू केले पाहिजे. त्यानंतर हे विद्यापीठ पुन्हा सुरू केले पाहिजे.''असा सल्ला स्वामी यांनी दिला. तसेच जेएनयूचे नामांतर करून नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ करावे अशी मागणीही त्यांनी केली.  

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीjnu attackजेएनयूEducationशिक्षण