शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Kedarnath: केदारनाथमध्ये हरवलं महिलेचं कुटुंब, मग घडला असा चमत्कार, ऐकून तुम्हीही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 10:25 IST

Kedarnath: केदारनाथच्या तीर्थयात्रेसाठी एक महिला सहकुटुंब येथे आली होती. पवित्र ठिकाणी आल्याने आनंदात असलेली ही महिला गर्दीत कुटुंबीयांपासून वेगळी झाली. भाषेच्या समस्येमुळे ती या अनोळखी ठिकाणी हरवली. त्यानंतर...

केदारनाथच्या तीर्थयात्रेसाठी एक महिला सहकुटुंब येथे आली होती. पवित्र ठिकाणी आल्याने आनंदात असलेली ही महिला गर्दीत कुटुंबीयांपासून वेगळी झाली. भाषेच्या समस्येमुळे ती या अनोळखी ठिकाणी हरवली. भाषेची समस्या असल्याने तिला संपर्क साधता येईना. त्यामुळे तिला एकाकी वाटू लागले. त्यानंतर तिने तांत्रिक मदत घेण्याचा विचार केला. तिने गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली. त्यामुळे ती अनोळखी लोकांशी संवाद साधण्यात यशस्वी झाली. त्यांनी तिची कुटुंबीयांशी पुन्हा भेट घालून देण्यात मदत केली.

ही ६८ वर्षीय महिला आंध्र प्रदेशमधील असून, ती तेलुगू भाषा चांगल्या पद्धतीने जाणते. मात्र हिंदी आणि इंग्रजीतून बोलण्यात असमर्थ होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे केदारनाथमधून परतत असताना ही महिला कुटुंबीयांपासून वेगळी झाली. ती गौरीकुंड शटल पार्किंगमध्ये होती. या महिलेला पोलीस अधिकाऱ्यांसोबत हिंदी किंवा इंग्रजीमध्ये संवाद साधता येत नव्हता.

पोलीस इन्स्पेक्टर रमेशचंद्र बेलवाल यांनी पीटीआय-भाषा ला सांगितले की, आम्ही जेव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हिंदी किंवा इंग्रजीत बोलू शकत नसल्याचे दिसून आहे. आम्ही तिला हावभावांच्या मदतीने तिचं कुटुंब पुन्हा मिळेल, असं सांगितलं. आम्ही तिला पाणी पाजले. तसेच ती जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होती, त्याची व्याख्या करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली.

जेव्हा पोलिसांनी महिलेने तेलुगूमध्ये सांगितलेला नंबर डायल केला, तेव्हा समजले की, तिचं कुटुंब हे सोनप्रयाग येथे होतं. हे ठिकाण गौरीकुंड येथून सुमारे ८ किमी दूर आहे. वृद्ध महिला एकटी राहिली होती. तर तिचं कुटुंब तिला शोधत होतं. अखेर पोलिसांनी गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून या महिलेच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात यश मिळवलं. एका वृत्तसंस्थेला सांगितले की, या महिलेच्या कुटुंबीयांची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी एका विशेष गाडीची व्यवस्था करून या महिलेला सोनप्रयाग येथे नेले. तिथे तिच्या कुटुंबाशी भेट घालून देण्यात आली. 

टॅग्स :KedarnathकेदारनाथWomenमहिलाPoliceपोलिस