शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

Kavach Technology : जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 14:19 IST

हे कवच अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात एक दिवस नक्कीच रेल्वे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास वाटत होता. पण...

ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताने भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भातील रेल्वेच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बालासोरम येथील रेल्वे अपघातानंतर, रेल्वेचे एक संरक्षण कवच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या कवचाचे गेल्या वर्षीच उद्घाटन झाले होते. खरे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच रेल्वेने हे 'कवच' तयार करून घेतले होते. हे कवच अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात एक दिवस नक्कीच रेल्वे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास वाटत होता. मात्र यातच, बालासोरमधील दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवले आहे.

'कवच'चे झाले होते यशस्वी परीक्षण -तेव्हा रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी भारतीय रेल्वेचे हे कवच म्हमजे मास्टर स्ट्रोक आणि मोठी क्रांती मानले जात होते. एवढेच नाही, तर रेल्वेने असे तंत्रज्ञा विकसित केले आहे, ज्यामुळे एकाच पटरीवर ट्रेन समोरा-समोर आल्या तरीही अपघात होणार नाही, असे यासंदर्भात बोलले जात होते. तसेच, ही 'कवच' टेक्नॉलॉजी (Kavach Technology) लवकरच देशातील सर्वच रेल्वे ट्रॅक आणि सर्व रेल्वे गाड्यांमध्ये इंस्टाल केली जाईल, असे तेव्हा स्वतः सरकरने म्हटले होते.

मार्च 2022 मध्ये झालेल्या कवच तंत्रज्ञानाच्या चाचणी वेळी एकाच ट्रॅकवर धावणाऱ्या दोन ट्रेनपैकी एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बसले होते, तर दुसऱ्या ट्रेनच्या इंजिनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बसले होते. यावेळी, एकाच ट्रॅकवर समोरा समोरून येणारी ट्रेन आणि इंजिन यांच्यात 'कवच' तंत्रज्ञानामुळे अपघात झाली नाही, कारण कवचने रेल्वेमंत्र्यांची ट्रेन समोरून येणाऱ्या इंजिनापासून 380 मीटर अंतरावर थांबवली होती. अशा प्रकारे परीक्षण यशस्वी ठरले होते.

काय म्हणाले होते रेल्वे मंत्री -यशस्वी ट्रायलनंतर, रेल्वे मंत्री म्हणाले होते, जर एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरा समोर असती, तर Kavach टेक्नोलॉजी ट्रेनची स्पीड कमी करून इंजिनला ब्रेक लावते. यामुळे दोन्ही ट्रेन एकमेकांवर धडकण्यापासून वाचतील. 2022-23 मध्ये कवच टेक्नॉलॉजी 2000 किलोमीटर रेल्वे नेटवर्कवर वापरात आणली जाईल. यानंतर दर वर्षी 4000-5000 किलोमीटर नेटवर्क जोडले जाईल. 

आरडीएसओने केले होते डेव्हलप -ही कवच टेक्नोलॉजी देशातील तीन व्हेडर्सच्या सोबतीने मिळून आरडीएसओ (RDSO) डेव्हलप केली होती. महत्वाचे म्हजे, RDSO ने याच्या वापरासाठी ट्रेनची स्पीड लिमिट जास्तीत जास्त ताशी 160 किलोमीटर निश्चित केली होती. या सिस्टिममध्ये  'कवच'चा संपर्क पट्रीबरोबरच ट्रेनच्या इंजिनसोबत येतो. पट्रिसोबत याचे एक रिसिव्हर असते. तसेच ट्रेनच्या इंजिनमध्ये एक ट्रान्समीटर लावले जाते. यामुळे ट्रेनचे परफेटक्ट लोकेशन समजते. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेOdishaओदिशाrailwayरेल्वे