शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Kavach Technology : जर ट्रेनमध्ये असतं हे 'कवच', तर ओडिशात एवढी मोठी रेल्वे दुर्घटना घडली नसती! जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 14:19 IST

हे कवच अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात एक दिवस नक्कीच रेल्वे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास वाटत होता. पण...

ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताने भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भातील रेल्वेच्या दाव्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बालासोरम येथील रेल्वे अपघातानंतर, रेल्वेचे एक संरक्षण कवच प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या कवचाचे गेल्या वर्षीच उद्घाटन झाले होते. खरे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करूनच रेल्वेने हे 'कवच' तयार करून घेतले होते. हे कवच अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात एक दिवस नक्कीच रेल्वे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास वाटत होता. मात्र यातच, बालासोरमधील दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवले आहे.

'कवच'चे झाले होते यशस्वी परीक्षण -तेव्हा रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी भारतीय रेल्वेचे हे कवच म्हमजे मास्टर स्ट्रोक आणि मोठी क्रांती मानले जात होते. एवढेच नाही, तर रेल्वेने असे तंत्रज्ञा विकसित केले आहे, ज्यामुळे एकाच पटरीवर ट्रेन समोरा-समोर आल्या तरीही अपघात होणार नाही, असे यासंदर्भात बोलले जात होते. तसेच, ही 'कवच' टेक्नॉलॉजी (Kavach Technology) लवकरच देशातील सर्वच रेल्वे ट्रॅक आणि सर्व रेल्वे गाड्यांमध्ये इंस्टाल केली जाईल, असे तेव्हा स्वतः सरकरने म्हटले होते.

मार्च 2022 मध्ये झालेल्या कवच तंत्रज्ञानाच्या चाचणी वेळी एकाच ट्रॅकवर धावणाऱ्या दोन ट्रेनपैकी एका ट्रेनमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव बसले होते, तर दुसऱ्या ट्रेनच्या इंजिनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बसले होते. यावेळी, एकाच ट्रॅकवर समोरा समोरून येणारी ट्रेन आणि इंजिन यांच्यात 'कवच' तंत्रज्ञानामुळे अपघात झाली नाही, कारण कवचने रेल्वेमंत्र्यांची ट्रेन समोरून येणाऱ्या इंजिनापासून 380 मीटर अंतरावर थांबवली होती. अशा प्रकारे परीक्षण यशस्वी ठरले होते.

काय म्हणाले होते रेल्वे मंत्री -यशस्वी ट्रायलनंतर, रेल्वे मंत्री म्हणाले होते, जर एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरा समोर असती, तर Kavach टेक्नोलॉजी ट्रेनची स्पीड कमी करून इंजिनला ब्रेक लावते. यामुळे दोन्ही ट्रेन एकमेकांवर धडकण्यापासून वाचतील. 2022-23 मध्ये कवच टेक्नॉलॉजी 2000 किलोमीटर रेल्वे नेटवर्कवर वापरात आणली जाईल. यानंतर दर वर्षी 4000-5000 किलोमीटर नेटवर्क जोडले जाईल. 

आरडीएसओने केले होते डेव्हलप -ही कवच टेक्नोलॉजी देशातील तीन व्हेडर्सच्या सोबतीने मिळून आरडीएसओ (RDSO) डेव्हलप केली होती. महत्वाचे म्हजे, RDSO ने याच्या वापरासाठी ट्रेनची स्पीड लिमिट जास्तीत जास्त ताशी 160 किलोमीटर निश्चित केली होती. या सिस्टिममध्ये  'कवच'चा संपर्क पट्रीबरोबरच ट्रेनच्या इंजिनसोबत येतो. पट्रिसोबत याचे एक रिसिव्हर असते. तसेच ट्रेनच्या इंजिनमध्ये एक ट्रान्समीटर लावले जाते. यामुळे ट्रेनचे परफेटक्ट लोकेशन समजते. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेOdishaओदिशाrailwayरेल्वे