शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

इंटरनेट सेवेच्या आदेशाने काश्मिरी जनता आनंदित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 06:03 IST

इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क आहे या सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताबद्दल काश्मीरमधील जनतेने आनंद व्यक्त केला आहे.

श्रीनगर : इंटरनेटचा वापर हा मूलभूत हक्क आहे या सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मताबद्दल काश्मीरमधील जनतेने आनंद व्यक्त केला आहे. इंटरनेट सेवेवरील बंदीचा सात दिवसांच्या आत फेरविचार करा या न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेल्या आदेशामुळे काश्मीरमध्ये लवकरच ही सेवा पुन्हा सुरू होईल अशी आशाही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम ५ आॅगस्ट रोजी रद्दबातल करण्यात आले. तेव्हापासून या भागातील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशाबद्दल श्रीनगरच्या लाल चौकातील व्याावसायिक इश्तियाक अहमद यांनी सांगितले की, इंटरनेटबंदीबाबत फेरविचार करावा या आदेशामुळे सामान्य जनतेला खूपच मोठा दिलासा मिळाला आहे. इंटरनेट सेवेवरील बंदीमुळे काश्मीरमधील केवळ व्यापारउदीमालाच नव्हे तर प्रत्येक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. ५ आॅगस्टपासून आतापर्यंत काश्मीरमधील व्यापारक्षेत्रासाठी अत्यंत वाईट काळ होता. इंटरनेट ही आज प्रत्येकाची विशेषत: व्यापारी लोकांसाठी महत्त्वाची गरज झाली आहे. ही सेवा बंद असल्यामुळे आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.काश्मीरमधील एका पर्यटन व्यावसायिकाने सांगितले की, काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा पुन्हा सुरू झाल्याने तेथील पर्यटन व्यवसाय पुन्हा उभारी घेईल. पर्यटन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर इंटरनेट सेवेवर अवलंबून आहे. तिकीटाचे आरक्षण करण्यापासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सारे काही आजकाल आॅनलाईनच होते. आफरिन मुश्ताक या विद्यार्थिनीने म्हटले आहे की, काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थीवर्गालाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. या बंदीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे उशीरा का होईना काश्मीरमधील जनतेला दिलासा मिळाला आहे. (वृत्तसंस्था)>प्रसारमाध्यमांसाठी चांगली बातमीश्रीनगर येथील एका पत्रकाराने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेला आदेश ही काश्मीरमधील प्रसारमाध्यमांसाठीही चांगली बातमी आहे. त्यांना पुन्हा मोकळ्या वातावरणात आपले काम करता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयJammu Kashmirजम्मू-काश्मीर