शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"आता पर्यायच उरला नाही", काश्मिरी पंडितांवर पुन्हा नामुष्की?, 'टार्गेट किलिंग'मुळे भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:29 IST

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून 'टार्गेट किलिंग'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून 'टार्गेट किलिंग'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे. काश्मीर सोडून जाण्याशिवाय आमच्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही, असं काश्मिरी पंडितांनी म्हटलं आहे. गेल्या दिवसांमध्ये दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडित, हिंदू आणि परराज्यातील नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. याशिवाय काही स्थानिक नागरिकांवरही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी  बडगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची त्यांच्याच कार्यालयात जाऊन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर काश्मिरी पंडितांनी या घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं देखील केली होती. 

काश्मीर खोरं पूर्वीपेक्षा खूप शांत झाल्यानं अनेक काश्मिरी पंडित कुटुंब पुन्हा काश्मीर खोऱ्यात स्थायिक झाले होते. पण आता पुन्हा एकदा या भागात काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जाऊ लागलं आहे. यामुळे या समुदायामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याच मु्द्द्यावरुन काश्मिरी पंडितांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. दुसरीकडे सातत्यानं काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात असल्यामुळे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येण्याबाबतही चर्चा केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली होती. 

कुलगाममध्ये बँक कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्याकुलगाममध्ये आज दहशतवाद्यांनी बँक परिसरात एका बँक कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या. यात बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती मूळचा राजस्थानचा असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यात १ मे पासून तिसऱ्यांदा एका बिगर मुस्लिम व्यक्तीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. तर गेल्या महिन्याभरात टार्गेट किलिंगचं हे आठवं प्रकरण आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय कुमार हे दक्षिण काश्मीर जिल्ह्यात एका बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत होते. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर गंभररित्या जखमी झालेल्या विजय कुमार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी