काश्मिरींचा लढा अर्ध्यावर सोडला जाणार नाही - पाक
By Admin | Updated: August 16, 2015 00:48 IST2015-08-16T00:48:46+5:302015-08-16T00:48:46+5:30
काश्मिरींनी स्वातंत्र्यासाठी चालविलेला कायदेशीर लढा अर्ध्यावर सोडून दिला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी

काश्मिरींचा लढा अर्ध्यावर सोडला जाणार नाही - पाक
नवी दिल्ली : काश्मिरींनी स्वातंत्र्यासाठी चालविलेला कायदेशीर लढा अर्ध्यावर सोडून दिला जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अनेक दशकांपासूनचा वाद सोडविण्यासाठी भारतासोबत सर्वसामान्य आणि सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याची गरजही प्रतिपादित केली.
पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकिस्तानी दूतावासात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या इच्छा-आकांक्षेकडे डोळेझाक केली जाणार नाही. त्यांच्या कायदेशीर लढ्याला कितीही वेळ लागो, त्यांची मागणी थंडबस्त्यात ठेवली जाणार नाही, असे ते म्हणाले. पाकने नेहमी भारतासोबत सर्वसामान्य आणि सहकार्याचे संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२३ आॅगस्टला ‘एनएसए’ चर्चा
- प्रथमच नवी दिल्ली येथे २३ आॅगस्ट रोजी दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) दहशतवादाच्या मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
- पंजाबमधील गुरुदासपूर आणि जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत भारताकडून ठोस पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे.