शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kashmir Target Killing: काश्मीर बिहारींकडे सोपवा, सगळ्यांना सुतासारखे सरळ करू, बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचा अजब दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:14 IST

Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख Jitan Ram Manjhi यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.

पाटणा -  काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पक्षाचे प्रमुख जीतनराम मांझी यांनी ट्विट करत मोठं विधान केलं आहे.  मांझी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावर निशाणा साधताना जर काश्मीर शांत करायचं असेल तर ते बिहारींकडे सोपवा असं विधान केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये १८ मार्चचं ट्विट रिट्विट करताना मांझी यांनी सांगितले की, आम्ही आधीच सांगितलं होतं की, द काश्मीर फाईल्स चित्रपट हा एक दहशतवादी कट आहे. हा चित्रपट दाखवून काश्मीरमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतावादी कारवायांनी माझं म्हणणं खरं ठरवलं आहे. आता मी केवळ एवढंच सांगेन की, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर काश्मीर बिहारींकचे सोपवा, सर्व काही ठीक होईल.

तत्पूर्वी जीतनराम मांझी यांनी १८ मार्च रोजी ट्विट करत द काश्मीर फाईल्स हा एक व्यापक कट असू शकतो. हा चित्रपट दाखवून दहशतवादी संघटना काश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे काश्मिरी ब्राह्मण पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात येऊ नयेत. दरम्यान, या चित्रपटामधील युनिटच्या सदस्यांच्या दहशतवादी कनेक्शनचीही सरकारकडून तपासणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादBiharबिहार