शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा पाककडून संयुक्त राष्ट्रात शस्त्रासारखा वापर; काँग्रेसमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 10:32 IST

पाकिस्तानच्या एका कृत्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या एका कृत्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्ताननं काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रात दिलेल्या प्रस्तावात राहुल गांधींच्या विधानाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर काँग्रेसनं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, पाकिस्तान राहुल गांधींचं नाव विनाकारण बदनाम करत आहे. जेणेकरून ते करत असलेले खोटे दावे खरे ठरतील. रणदीप सुरजेवाला म्हणाले, पाकिस्तानकडून राहुल गांधींसंदर्भात चुकीची माहिती दिली जात आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, याबद्दल जग साशंक नाही. पाकिस्ताननं किती खोट बोलण्याचा प्रयत्न केला तर सत्य बदलणार नाही. काश्मीरच्या मुद्द्यावर आम्ही मोदी सरकारबरोबर असल्याचंही यापूर्वीच राहुल गांधींनी सांगितलं आहे. ते लिहितात, मी मोदी सरकारच्या अनेक निर्णयांशी असहमत आहे. परंतु मी स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यात हस्तक्षेप करण्यासाठी पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला गरज नाही. जम्मू-काश्मीरमध्ये झालेली हिंसा हीसुद्धा पाकपुरस्कृत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्यामुळे एवढी वर्षं जम्मू-काश्मीर अशांत होतं. जगभरातही पाकिस्तानला दहशतवाद्यांचं प्रमुख आश्रयस्थान असल्याच्या नजरेतूनच पाहिलं जातं.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीImran Khanइम्रान खान