शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

'मोदी पाकिस्तानला शरण गेल्यानेच काश्मिरात विधानसभा निवडणुका नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 05:58 IST

मोदी सरकार पाकिस्तान व दहशतवाद्यांना शरण गेल्यामुळेच लोकसभा निवडणुकांबरोबर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय टाळण्यात आला अशी खरमरीत टीका नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकार पाकिस्तान व दहशतवाद्यांना शरण गेल्यामुळेच लोकसभा निवडणुकांबरोबर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय टाळण्यात आला अशी खरमरीत टीका नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. या निर्णयाचा काश्मीरमधील इतर पक्षांच्या नेत्यांनीही निषेध केला आहे.ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, मोदी यांनी हुरियत नेत्यांसमोरही गुडघे टेकले आहेत. छप्पन इंची छाती असलेला नेता अपयशी ठरला आहे. भारतविरोधी शक्तींच्या पुढे शरणागती पत्करण्याची कृती निषेधार्ह आहे. मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती व्यवस्थितपणे न हाताळल्याने ती अधिक गंभीर झाली आहे.लोकसभा निवडणुकांबरोबरच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील तसेच त्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्थाही पुरविली जाईल असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभा व राज्यसभेत तसेच दिल्लीत नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही दिले होते. त्याचे नेमके काय झाले असा सवालही ओमर यांनी विचारला आहे.काश्मीरची परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर : काँग्रेसजम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. ए. मीर यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा केंद्र सरकारकडून करण्यात येणारा दावा फोल ठरला आहे. या राज्यातील स्थिती हाताबाहेर गेल्यानेच तिथे लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभा निवडणुका न घेण्याचा निर्णय झाला. काश्मीरी लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यास मोदी सरकार पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. काश्मीरमधील माकपचे नेते व माजी आमदार एम. वाय. तारिगामी म्हणाले की, सर्व पक्षांनी मागणी करूनही काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचे टाळण्यात आल्याने संपूर्ण देशात चुकीचा संदेश गेला आहे. राज्यातील स्थिती जर योग्य नसेल तर तिथे लोकसभा निवडणुका देखील व्हायला नकोत. मात्र त्यांना हिरवा कंदिल व विधानसभा निवडणुकांबद्दल नकारघंटा ही अतार्किक गोष्टआहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यपालांचे अभिनंदन केले होते. मग त्यानंतर आता नेमके असे काय घडले हे जनतेला कळले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूकFarooq Abdullahफारुख अब्दुल्ला