शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

Karunanidhi Death Update : द्रविड राजकारणाची 50 वर्षे, करुणानिधींचा राजकीय प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:13 IST

Karunanidhi Death : करुणानिधी यांचा आमदार ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

चेन्नई : मुथुवेल करुणानिधी यांनी मुख्यमंत्री या नात्याने तामिळनाडू राज्याची धुरा पाच वेळा सांभाळली आहे. सलग 50 वर्षे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. करुणानिधी यांचा आमदार ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

1) स्वातंत्र्यानंतर द्राविडार कळघम पक्षामध्ये फूट पडली. करुणानिधी यांनी त्यांचे राजकीय गुरू अण्णादुराई यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. 1949 साली अण्णादुराई यांच्याबरोबर त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोशाध्यक्ष झाले.

2) 1957 साली द्रमुकने तामिळनाडू विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पक्षाचे 13 सदस्य विधानसभेत निवडून गेले. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होते. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते.

3) त्यानंतर त्यांनी 12 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते नेहमीच विजयी होत राहिले. तामिळनाडूचे पाचवेळा मुख्यमंत्री झाले.

4) 1967 साली अण्णादुराई तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर करुणानिधी यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आणि ते सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग खात्याचे मंत्री झाले व त्यांना कॅबिनेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले.

5) 1969 साली अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर ते द्रमुक पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. 1971 साली त्यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले.

6) 1977 साली एम. जी. रामचंद्रन म्हणजे एमजीआर त्यांच्या पक्षातून बाहेर पडले व अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष सत्तेत आला. 1987 पर्यंत एमजीआर सत्तेत राहिले.

7) 1987 साली एमजीआर यांचे निधन झाल्यावर दोन वर्षांमध्येच करुणानिधी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.

1989 साली लोकसभा निवडणुकांमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी केंद्रामध्ये व्ही. पी. सिंग यांच्या राष्ट्रीय आघाडी सरकारमध्ये करुणानिधी यांनी आपले भाचे मुरासोली मारन यांना स्थान मिळवून दिले.

8) 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही त्यांचा पक्ष सहभागी झाला. 2004 पर्यंत ते भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी सरकारमध्ये राहिले.

9) 2004 साली करुणानिधी यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करत संपुआ सरकारमध्येही स्थान मिळवले. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणूकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.  2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष विजयी झाला. सध्या त्यांचा पक्ष तामिळनाडू विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे.

10) आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत करुणानिधींनी कुलीतलाई, तंजावर, सैदापेट, अण्णानगर, हार्बर, चेपॉक, तिरुवरुर मतदारसंघातून निवडणूक लढवली.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीChennaiचेन्नईTamilnaduतामिळनाडू