शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

Karunanidhi Death Update : द्रविड राजकारणाची 50 वर्षे, करुणानिधींचा राजकीय प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:13 IST

Karunanidhi Death : करुणानिधी यांचा आमदार ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

चेन्नई : मुथुवेल करुणानिधी यांनी मुख्यमंत्री या नात्याने तामिळनाडू राज्याची धुरा पाच वेळा सांभाळली आहे. सलग 50 वर्षे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. करुणानिधी यांचा आमदार ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

1) स्वातंत्र्यानंतर द्राविडार कळघम पक्षामध्ये फूट पडली. करुणानिधी यांनी त्यांचे राजकीय गुरू अण्णादुराई यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. 1949 साली अण्णादुराई यांच्याबरोबर त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोशाध्यक्ष झाले.

2) 1957 साली द्रमुकने तामिळनाडू विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पक्षाचे 13 सदस्य विधानसभेत निवडून गेले. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होते. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते.

3) त्यानंतर त्यांनी 12 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते नेहमीच विजयी होत राहिले. तामिळनाडूचे पाचवेळा मुख्यमंत्री झाले.

4) 1967 साली अण्णादुराई तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर करुणानिधी यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आणि ते सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग खात्याचे मंत्री झाले व त्यांना कॅबिनेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले.

5) 1969 साली अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर ते द्रमुक पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. 1971 साली त्यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले.

6) 1977 साली एम. जी. रामचंद्रन म्हणजे एमजीआर त्यांच्या पक्षातून बाहेर पडले व अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष सत्तेत आला. 1987 पर्यंत एमजीआर सत्तेत राहिले.

7) 1987 साली एमजीआर यांचे निधन झाल्यावर दोन वर्षांमध्येच करुणानिधी पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.

1989 साली लोकसभा निवडणुकांमध्ये फारसे यश मिळाले नसले तरी केंद्रामध्ये व्ही. पी. सिंग यांच्या राष्ट्रीय आघाडी सरकारमध्ये करुणानिधी यांनी आपले भाचे मुरासोली मारन यांना स्थान मिळवून दिले.

8) 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही त्यांचा पक्ष सहभागी झाला. 2004 पर्यंत ते भारतीय जनता पार्टीबरोबर आघाडी सरकारमध्ये राहिले.

9) 2004 साली करुणानिधी यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करत संपुआ सरकारमध्येही स्थान मिळवले. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणूकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.  2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष विजयी झाला. सध्या त्यांचा पक्ष तामिळनाडू विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे.

10) आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत करुणानिधींनी कुलीतलाई, तंजावर, सैदापेट, अण्णानगर, हार्बर, चेपॉक, तिरुवरुर मतदारसंघातून निवडणूक लढवली.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीChennaiचेन्नईTamilnaduतामिळनाडू