शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी vs मनमोहनसिंग सरकार; कोणाच्या काळात किती जणांना मिळाला भारतरत्न? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 16:45 IST

मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे.

Karpuri Thakur BharatRatna: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर  समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना केंद्र सरकारने भारतरत्न (मरणोत्तर) पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. अशातच, मोदी सरकार आणि मनमोहन सरकार यांच्या कार्यकाळात सर्वाधिक भारतरत्न कोणाला मिळाले, याची चर्चा सुरू झाली. 

2024 साली मोदी सरकार सत्तेवर आले आणि त्याच वर्षी देशातील दोन व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला. क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव म्हणजेच सीएनआर राव यांना मोदी सरकारच्या काळात भारतरत्न देण्यात आला, पण त्यांच्या नावांची घोषणा मोदी सरकारच्या स्थापनेपूर्वी फेब्रुवारीमध्येच झाली होती.

मनमोहन सिंग सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात (2004-2014) केवळ 3 जणांना भारतरत्न देण्यात आला. यामध्ये पंडित भीमसेन जोशी (2008), सचिन तेंडुलकर (2014) आणि सीएनआर राव (2014) यांचा समावेश आहे. तर, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात 6 व्यक्तींना भारतरत्न देऊन सन्मानित केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून सुरुवातमोदी सरकारच्या काळात 2015 मध्ये पहिल्यांदा भारतरत्न जाहीर झाला होता. मोदी सरकारने अनेक वर्षांपासूनची मागणी मंजूर करून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना हा सन्मान दिला. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा गौरव केला होता. त्याच वर्षी स्वातंत्र्यसेनानी आणि हिंदू महासभेचे नेते महामानव मदन मोहन मालवीय यांनाही भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती.

प्रणव मुखर्जी यांनाही भारतरत्न 2019 मध्ये मोदी सरकारने भारतरत्नसाठी 3 नावांची घोषणा केली. यामध्ये प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांचा समावेश होता. या तीन नावांमध्ये सर्वाधिक चर्चा होती ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची. याबाबत काँग्रेसची भूमिका काय असेल, अशी चर्चा होती, मात्र पक्षाने निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे काँग्रेस नेत्यांनी स्वागत केले. पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या आणि आपल्या जीवनात आत्मसात करणाऱ्या अशा व्यक्तीच्या सेवांचा गौरव करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले.

कर्पूरी ठाकूर अन् मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोकमंगळवारी मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या पावलाला मास्टर स्ट्रोक म्हटले जात आहे. या निर्णयातून मोदी सरकारने बिहारमधील मागास समाजाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत दिसून येईल, असे बोलले जात आहे.

काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केलेमोदी सरकारच्या नुकत्याच झालेल्या घोषणेनंतर पुन्हा एकदा काँग्रेसवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, आम्ही अनेक दिवसांपासून ही मागणी करत आहोत. काँग्रेसही सत्तेत आहे. इतर लोकही सत्तेत राहिले, पण भारतरत्न दिला गेला नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगCentral Governmentकेंद्र सरकारBiharबिहार