शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा सत्ता आल्यास मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवू - कुमारस्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 14:27 IST

H. D. Kumaraswamy : जनता दल सेक्युलरने असेही जाहीर केले आहे की, महिला, दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांमधील उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी विचार केला जाईल.

कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच आता जनता दल सेक्युलरचे (Janata Dal Secular) नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी एक मोठे विधान केले आहे. कर्नाटकात जेडीएसची सत्ता आल्यास पक्ष मुस्लिम नेत्याला मुख्यमंत्री बनवेल, असे विधान एचडी कुमारस्वामी यांनी केले आहे.

जनता दल सेक्युलरने असेही जाहीर केले आहे की, महिला, दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांमधील उपमुख्यमंत्री बनवण्यासाठी विचार केला जाईल. जर परिस्थितीची मागणी झाल्यास पक्ष अल्पसंख्याक समुदायातील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही आहे. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले, "फक्त जेडीएसजवळ अशा वादविवादाची तरतूद आहे आणि पक्ष मुस्लिम नेत्याबद्दल खूप मोकळा आहे."

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचरत्न यात्रेचा भाग म्हणून कोलार जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी मुस्लिम मुख्यमंत्र्यांबाबत माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले, "पक्षाध्यक्ष सीएम इब्राहिम यांनी म्हटले आहे की, जनता दल सेक्युलर पुन्हा सत्तेत आल्यास त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. असे का होणार नाही?"

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी मंगळवारी कोलारमध्ये म्हणाले, "वसंतनरसापुरा येथे एका दलित तरुणाने मला भेटून त्याच्या समस्या सांगितल्या. यानंतर मी जाहीर केले की, माझा पक्ष सत्तेवर आल्यास उपमुख्यमंत्रीपद दलितासाठी तयार केले जाईल." ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये खूप संघर्ष केल्यानंतर जी परमेश्वर उपमुख्यमंत्री झाले आणि गोविंद करजोल यांचे नाव भाजपच्या हायकमांडला पुढे करावे लागले आणि हे दोन्ही नेते दलित समाजातून आलेले आहेत. 

याचबरोबर, महिला व बालकल्याण विभाग पुरेसे काम करत नसल्याचा आरोप करत महिलांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्रीपदी एका महिलेची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सत्तेत आल्यावर रायथा चैतन्य (Raitha Chaitanya) नावाचा कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी काम करणार असल्याचेही सांगितले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणMuslimमुस्लीम