शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:21 IST

खर्गे कर्नाटकच्या नेत्यांसोबत जाहीरनाम्यावर चर्चा करत होते. यावेळी त्यांनी तुमचे पाहून आम्ही महाराष्ट्रातही पाच गॅरंटीचा वादा केला जात आहे. आज तुम्हीच सांगत आहात की गॅरंटी रद्द करणार आहात, असे म्हटले.

निवडणूक आली की आम्ही हे देऊ, ते देऊ अशा भरमसाठ घोषणा केल्या जातात. नंतर सरकार आले की त्या पूर्णत्वास आणल्या जातात. यासाठी सरकारची ऐपत, उत्पन्न आदी काही पाहिले जात नाही. निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासने पूर्ण करता करता मग ते राज्यच आर्थिक संकटात येते. असाच प्रकार कर्नाटकसोबत घडला आहे. यावरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्याच सरकारांचे कान टोचले आहेत. 

खर्गे कर्नाटकच्या नेत्यांसोबत जाहीरनाम्यावर चर्चा करत होते. यावेळी त्यांनी तुमचे पाहून आम्ही महाराष्ट्रातही पाच गॅरंटीचा वादा केला जात आहे. आज तुम्हीच सांगत आहात की गॅरंटी रद्द करणार आहात. असे वाटतेय की तुम्ही वृत्तपत्र वाचत नाही आहात. मी वाचलेय म्हणून बोलतोय. आम्ही तुमच्या सरकारच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रातही राबविण्याचा विचार करत आहोत. परंतू मी तेथील नेत्यांना स्पष्ट सांगितलेय की पाच, सहा, सात आठ गॅरंटी अशी आश्वासने देऊ  नका, अशी आश्वासने द्या जी आर्थिक कुवतीमध्ये बसतील, असे खर्गे म्हणाले. 

जर तुम्ही बजेट विचारात न घेता आश्वासने दिली तर ते राज्य तुम्ही आर्थिक दिवाळखोरीकडे न्याल. रस्त्यांवर टाकायला रेतीसाठीही पैसे राहणार नाहीत. जर हे सरकार फेल झाले तर त्याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर होणार आहे. यामुळे बदनामी होईल आणि पुढील दहा वर्षे या सरकारवर प्रतिबंध येऊ शकतात. यामुळे अंथरून पाहून पाय परसावेत, असा सल्ला खर्गे यांनी कर्नाटकच्या नेत्यांना दिला आहे. 

राहुल गांधी यांनी देखील बजेटनुसार महाराष्ट्रात घोषणा करण्याबाबत सांगितले आहे. १५ दिवसांच्या चर्चेनंतर महाराष्ट्रात विनधानसभा निवडणुकीत काय जाहीरनामा द्यायचा याचा निर्णय घेतला गेला आहे. याची घोषणा नागपूर आणि मुंबईत करणार आहोत, असे खर्गे यांनी स्पष्ट केले. 

कर्नाटकमध्ये काँग्रेसने कोणत्या घोषणा केलेल्या...कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने लोकांना पाच गॅरंटी दिल्या होत्या. यात महिलांना दर महिन्याला २००० रुपये, बेरोजगार तरुणांना दोन वर्षांसाठी ३ हजार रुपये, गरीबांना दर महिन्याला प्रती व्यक्ती १० किलो तांदूळ, महिलांना मोफत बस प्रवास, प्रत्येक घराला २०० युनिटपर्यंत मोफत वीज या घोषणा केल्या होत्या. 

या योजना राबविल्यास...काँग्रेसने जर या पाचही योजना राबविल्या तर कर्नाटकची महसुली तूट ही ६० हजार कोटींवरून वाढून १ लाख १४ हजार कोटी रुपये होणार आहे. ही रक्कम बजेटच्या २१ टक्के आहे. सध्या या राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज आहे. यामुळे या योजना राबविल्यास ते कर्ज वाढणार आहे.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटकmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४