शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 14:36 IST

महाराष्ट्रात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी धक्कादायक दावा केला आहे.

Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत कसं मिळू शकतं असा सवाल मविआ नेत्यांनी केला. दुसरीकडे, कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली असल्याचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच हा प्रकार निवडक मतदारसंघामध्ये झाल्याचेही परमेश्वरा यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा हादरा बसला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना ५० आमदारांचाही आकडा गाठता आलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीमधल्या एकट्या भाजपने १३२ जागा मिळवल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले आहेत. महायुतीने २३३ जागांवर यश मिळवत इतिहास रचला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवरुन शंका उपस्थित केली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही ईव्हीएमवरुन प्रतिक्रिया देताना ते हॅक झाल्याचे म्हटलं आहे. "महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत खराब होती. हे सर्वांनाच माहीत आहे.  निवडणुकीसाठी योग्य रणनीती आखण्यातही आपण अपयशी ठरलो आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असे आम्हाला वाटले होते पण सगळेच उलटले. शनिवारी आमच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांची बैठक झाली आणि निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करण्यात आले. ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली आहे. हे प्रत्येक मतदारसंघात नाही, तर निवडक मतदारसंघामध्ये घडले. त्यांनी ईव्हीएम हॅक केल्याचं मला वाटतं आहे. हे खरे असेल तर यावर काहीही बोलण्याची गरज नाही. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत," असं कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्राच्या निकालानंतर लढा मोठा असून लोकांचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे म्हटलं आहे. "महाराष्ट्राचे निकाल अनपेक्षित आहेत. या निकालामागची खरी कारणे समजून घेण्याचा पक्ष प्रयत्न करत आहे. आम्ही आमचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानतो. छत्रपती शिवाजी, शाहूजी, फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे आम्ही खरे प्रतिनिधी आहोत, लढा मोठा असून जनतेचे प्रश्न मांडत राहू," असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEVM Machineईव्हीएम मशीन