शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याची तयारी, कर्नाटक सरकारचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:11 IST

फुगवट्याविषयी केंद्राच्या अहवालाची प्रतीक्षा

सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे कर्नाटक सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी वाढणार असून, सिंचन क्षेत्रातही भरीव वाढ होणार आहे.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, यासाठी राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे. अलमट्टी धरणाच्या फुगवट्याविषयी केंद्र सरकार अधिसूचना जारी करत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही वेगळा निर्णय घेणार नाही. पण, धरणातील पाणीसाठा ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.दरम्यान, अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत कृष्णेला महापूर येत नाही, हे वडनेरे समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे, तरीही अलमट्टीच्या उंचीवाढीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. धरणाच्या बॅक वॉटरचा आणि धरणामुळे कथित महापूर येण्याचा अभ्यास वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. तो अहवाल आल्यानंतरच अलमट्टी धरण आणि महापुराचा संबंध स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वीच काही कार्यकर्त्यांनी धरणाची उंची वाढविण्याला महाराष्ट्र सरकारने कायदेशीर आव्हान देण्याची मागणी सुरू केली आहे.

वडनेरे यांच्या विरोधी भूमिका संभ्रमाच्या२००५, २०१९ आणि २०२१ च्या महापुरानंतर त्याचा संबंध अलमट्टी धरणासोबत मोठ्या प्रमाणात जोडण्यात येऊ लागला आहे. महापुराच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या वडनेरे समितीने अलमट्टीमुळे महापूर येतो, हा दावा नि:संशयरीत्या फेटाळला आहे. सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून अहवालात तसे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.पण, अहवाल सादर करून झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे सुमारे वर्षभरापूर्वी समितीचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे यांनी आपलेच स्पष्टीकरण खोडून काढताना, अलमट्टीमुळे महापुराची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकDamधरणGovernmentसरकारfloodपूर