शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:39 IST

बंगळुरूमध्ये ४०० हून अधिक घरं पाडल्यानंतर कर्नाटक सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

बंगळुरूमध्ये ४०० हून अधिक घरं पाडल्यानंतर कर्नाटक सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या कारवाईमुळे शेकडो लोक बेघर झाले असून, त्यात प्रामुख्याने मुस्लिम समुदायातील लोकांचा समावेश आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे राजकारण तापलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता कोगिलू गावातील फकीर कॉलनी आणि वसीम लेआउटमध्ये पाडकाम करण्यात आलं. यामुळे सुमारे ४०० कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. कडाक्याची थंडी असताना ही कारवाई करण्यात आली. 'बंगळुरू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड' (BSWML) द्वारे राबवण्यात आलेल्या या मोहिमेत ४ जेसीबी आणि १५० हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होते.

याप्रकरणी कर्नाटक सरकारने स्पष्ट केलं की, ही घरे उर्दू सरकारी शाळेजवळील तलावाकाठी सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आली होती. मात्र रहिवाशांनी दावा केला आहे की, त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने बाहेर काढलं, त्यामुळे शेकडो लोकांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर आली आहेत.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काही रहिवाशांनी सांगितलं की, ते गेल्या २५ वर्षांपासून या भागात राहत आहेत आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे. तसेच बहुतेक लोक स्थलांतरित असून मजूर म्हणून काम करतात. या कारवाईविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून निदर्शने करत आहेत.एका गटाने महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांच्या घराबाहेरही निदर्शने केली. दलित संघर्ष समितीसारख्या अनेक संघटनांनीही या कारवाईचा निषेध करत आंदोलनात सहभाग घेतला आहे.

या कारवाईवरून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याला काँग्रेसचं "अल्पसंख्याक विरोधी राजकारण" असं म्हटल आहे. केरळचे मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी काँग्रेस सरकारची ही "अमानवीय कारवाई" आणीबाणीच्या काळाची आठवण करून देते. जे लोक धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीच्या नावावर सत्तेवर आले आहेत, ते गरीब लोकांची घरं तोडत आहेत असं म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Controversy Erupts as Congress Government Demolishes Homes in Karnataka

Web Summary : Karnataka's Congress government faces backlash after demolishing over 400 homes, primarily affecting Muslim communities. Residents claim no prior notice was given. Opposition parties criticize the action as anti-minority, sparking protests and political uproar.
टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसPoliticsराजकारण